Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उत्तर प्रदेशात तरुणींना मोबाइल वापरावर बंदी

Webdunia
बुधवार, 3 सप्टेंबर 2014 (10:43 IST)
उत्तर प्रदेशातील 'लव्ह जिहाद'च्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर एका सेवाभावी संस्थेने समाजातील विद्यार्थिनी तसेच तरुणींना मोबाइल वापरावर बंदी घातली आहे. तरुणींनी मोबाइलचा वापर करू नये,  असे आहावनही या संस्थेने केले आहे.  
 
अखिल भारतीय वैश्‍य एकता परिषदेने राज्यातील विद्यार्थिनी व युवतींना मोबाइल वापरावर बंदी घातली आहे. वैश्य समाजाची नुकतीच येथे बैठक झाली. केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा यांच्यासह हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते. राज्यातील सरकार एका विशिष्ट समाजाला विशेष सुविधा देत आहे, यामुळे आमच्या समाजातील युवतींना मोबाईल वापरण्यास बंदी घालणे जरूरी आहे, असे अध्यक्षांनी सांगितले. 
 
दरम्यान, राज्यातील युवतींनी मोबाईलचा वापर करू नये, असे खाप पंचायती व विविध संस्थांनी यापूर्वीच सांगितले आहे. मोबाईल व इंटरनेटच्या वापरामुळे युवती ‘लव्ह जिहाद‘च्या जाळ्यात फसण्याची जास्त शक्यता आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments