Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काश्मिर हा भारता आहे - स्वराज

Webdunia
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016 (10:24 IST)
जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, असाच तो  कायम राहणार आहे. काश्मीर बळकावण्याचं स्वप्न कोणीही पाहू नये, अशा कठोर शब्दात भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानलाइशारा दिला आहे. सुषमा स्वराज यांनी 71 व्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात सर्व देशांच्या प्रतिनिधींच्या साक्षीने पाकिस्तानचे कान ओढले आहेत.

दहशतवादाला थारा देणारे सर्वात मोठे दोषी असतात. दहशतवादाला पाठिंबा देणं हा काही देशांचा शौक असतो, अशा शब्दात स्वराज यांनी पाकिस्तानवर थेट निशाणा साधला.  पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी बलुचिस्तानात काय चाललं आहे, ते पाहावं, असंही स्वराज  म्हणाल्या आहेत.

विशेष म्हणजे, सुषमा स्वराज यांनी हिंदीतून भाषण केलं. भाषणाच्या सुरुवातील त्यांनी मानवता, शांती आणि गरिबीवर भाष्य केलं आहे . त्यानंतर त्यांनी जागतिक आणि देशाबाहेरील दहशतवादाकडे मोर्चावर बोलणे सुरु केले. काश्मीरला भारत भूमीपासून कोण आणि  कुणीही वेगळ करू शकत नाही. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो राहणारच आहे. पाकिस्तानने काश्मीर मिळवण्याचे स्वप्न पाहणे सोडून द्यावे असा सणसणीत टोला स्वराज यांनी पाकला लगावला आहे.स्वराज यांनी अनेक गोष्टी पाकिस्थान आणि त्याच्या निकटवर्तीय देशांना समजाऊन सांगितल्या आहेत. त्यामध्ये जराही हुशारी केली तर सर्व गोष्टी बिघडू शकतात असा इशारा स्वराज यांनी दिला आहे.  

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

पुढील लेख
Show comments