कॉँग्रेसने मला अपमान करुन बाजूला केल्याची टीका करीत आणि पर्यावरण प्रकल्पांबाबत दिलेल्या मंजुरींसाठी राहुल गांधी यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप करीत माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांनी पक्षाला ‘रामराम’ ठोकला आहे.
काँग्रेसनिष्ठ म्हणून ओळखल्या जाणाºया नटराजन यांनी कॉँग्रेसला सोडचिठ्ठी देताना पक्षाच्या धोरणांवर कडाडून टीका करीत गंभीर आरोपही केले आहेत.
अनेक निर्णय दबावाखाली घेतले गेल्याचा खुलासा त्यांनी केला यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचा हस्तक्षेप असल्याचे सुचित केले. याबाबत आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.