जम्मूमध्ये सुरू झालेल्या पावसामुळे पुराचं पाणी अनेक भागात शिरलं आहे. पाण्याच्या प्रवाहात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
जम्मू मधील बऱ्याच नद्या धोक्याची पातळी पार करण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं अलर्ट घोषित केलं आहे. गाडीगड परिसरात पोलीस चौकी परिसरात 4 फुटापर्यंत पाणी भरलं आहे. चौकी समोरच्या कार्यालयांच्या भिंती तोडून पाण्याचा प्रवाह पुढे सरकला आहे. मोठ्या प्रमाणावर घरांचं नुकसान झालं आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. प्रशासनानं हेल्पलाइन नंबर जारी केला असून संबंधित कर्मचारी आणि पोलिसांना देखील अलर्ट देण्यात आला आहे.