Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नशेत सलमानच गाडी चालवित होता...

Webdunia
नवी दिल्ली- हिट अँड रन प्रकरणात बॉलीवूड अभिनेता सलमान खानच दारूच्या नशेत गाडी चालवित होता, असे महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले असून त्याला निर्दोष मुक्त करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय बदलावा, अशी मागणी केली. 
 
महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत म्हटले की हा निर्णय अमान्य आणि दिशाभलू करणारा आहे. अपघातावेळी सलमानच कार चालवित होता, असा दावा महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणारे ऍडव्होकेट जनरल मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात केला. सलमानचा वाहनचालक गाडी चालवित होता, या दाव्याला रोहतगी यांनी विरोध केला. 
 
सलमान खानची बाजू प्रसिद्ध वकील कपिल सिब्बल यांनी मांडली. या सुनावणीनंतर न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 12 फेब्रुवारी ही तारीख निश्‍चित केली आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments