Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नसीरुद्दीन शहा यांनी अनुपम खेरना हाणला टोला

Webdunia
शनिवार, 28 मे 2016 (12:23 IST)
जी व्यक्ती कधीच काश्मिरमध्ये राहिलेली नाही, तीच व्यक्ती काश्मिरी पंडितांसाठी लढताना दिसत आहे. आता अचानक ती व्यक्ती 'विस्थापित' बनली आहे' अशा शब्दांत नसीरुद्दीन शहा यांनी अनुपम खेर  यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान अनुपम खेर यांनीही शहा यांच्या टीकेला ट्विटरवरुन उत्तर दिले आहे. 'शाह साब की जय हो. या तर्कानुसार एनआरआय लोकांनी तर भारताबाबत बिलकुल विचार करायलाच नको' असा टोला खेर यांनी ट्विटरवरून हाणला आहे.

आपल्याकडे लोक कोणत्याही सरकारबाबत फार लवकर मतं बनवतात, मात्र त्यांनी अशी घाई करू नये, प्रत्येकाला वेळ देणं गरजेचं आहे, असे शहा यांनी म्हटले. काही पाठ्यपुस्तकांत, अभ्यासक्रमात करण्यात आलेला बदल वा फेराफार याबद्दलही त्यांनी खेद व चिंता व्यक्त केली आहे. ' मात्र हे सरकार एवढंही मूर्ख नाही की, ते देशाला अंधकारात लोटेल.’ याची कल्पना असल्याचेही ते म्हणाले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments