Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताचे पाकला प्रत्युत्तर: 2 पाक सैनिक ठार, 14 चौक्या उद्ध्वस्त

Webdunia
श्रीनगर/जम्मू- पाककडून झालेल्या गोळीबारात आठ भारतीय नागरिक मारले गेल्यानंतर पाकच्या या कृत्याला जोरदार प्रत्युत्तर देत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन पाक सैनिक मारले गेल्याचे वृत्त आहे. भारतीय जवानांनी केलेल्या तुफान गोळीबारात पाकच्या तब्बल 14 चौक्याही उद्ध्वस्त झाल्या आहेत.
 
गेले काही दिवस पाककडून सुरु असलेल्या गोळीबारात आठ निरपराध भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावालागला आहे, तर 22 नागरिक जखमी झाले आहेत. त्यानंतर पाककडून होत असलेल्या सततच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्याचा संकल्प भारतीय सेनेने सोडला होता.
 
पाकिस्तान आर्मीने मंगळवारी पहाटे 5 वाजता नौशेरा सेक्टरमध्ये फायरिंग केली होती. येथील तीन नागरिक जखमी झाले होते. त्यानंतर सकाळी 6.30 वाजता जम्मूच्या सांबा येथील रामगड सेक्टरमध्ये फायरिंग करण्यात आली. येथे 19 वर्षाची एक मुलगी आणि 2 मुलांचा फायरिंगमध्ये मृत्यू झाला. दोनजण जखमी झाले होते.
 
पाकिस्तान आर्मीच्या फायरिंगनंतर बीएसएफने प्रत्युत्तरात जारदार फायरिंग केली.
 
त्यानंतर आरएस पूरामधील अरनिया सेक्टरमधून फायरिंगचे वृत्त आले. येथे पाक आर्मीने 82 एमएम मोर्टर हल्ला केला. सीमेलगतच्या अनेक गावांना लक्ष्य केले गेले. येथे तीनजण जखमी झाले आहे. अरनिया येथे झालेल्या फायरिंगमधील जखमी नागरिकांवर उपचार सुरु आहे.
 
पाकिस्तान सीमेवर आपली शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकने सीमेवरील सैन्याची संख्या वाढवली आहे. सैनिकांव्यतिरिक्त हेलिकॉप्टर आणि अंडर बॅरल ग्रेनेड लाँचरसह इतर मोठी शस्त्रास्त्रेसुद्धा सज्ज ठेवली आहेत.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments