suvichar

एकदा चार्ज केल्यावर तीन महिने चालणार मोबाइल

Webdunia
मोबाइल चार्ज करणे हे आता ब्रश आणि आंघोळ करण्यासारखे नित्याचे काम होऊन बसले आहे. पण भविष्यात हे काम रोज्याचा रोज करण्याची गरज उरणार नाही. कारण, यापुढे एकदा चार्ज केलेला मोबाइल तब्बल तीन महिने चार्ज करण्‍याची गरज लागणार नाही.
चकित झालात ना? पण हे खरे आहे. सध्याच्या शंभरपट कमी ऊर्जेचा वापर करणार्‍या मोबाइल प्रोसेसरचा शोध लावण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. मिशिगन आणि कॉर्नेल विद्यापीठातील वैज्ञानिकांनी हा शोध लावला आहे. मॅग्नेटोइलेक्ट्रि मल्टीफेरिक असे या उपकरणाचे नाव आहे. हे उपकरण चुंबकीय ध्रुवीय फिल्म तयार करणार्‍या अणूंचा थर पातळ करते. याच सिद्धांताचा वापर करून बायनरी कोड 1 आणि 0 कडे पाठविण्यासाठी करण्यात येतो, ज्यावर आपल्या संगणकाचे काम चालते.
 
मोबाइलमधील सध्याचे प्रोसेसर सेमीकंडक्टर प्रणालीचा वापर करून बनवले जातात. या प्रोसेसरना सतत वीजपुरवठ्याची गरज असते. याउलट, मॅग्नेटोइलेक्ट्रिक मल्टीफेरिक्स यंत्रणेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या प्रोसेसरला विजेच्या कमीत कमी दाबाची आवश्यकता असते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, हा प्रोसेसर विजेचा केवळ एक छोट्यात छोटा भाग वापरून डेटा मिळवू शकतो किंवा पाठवू शकतो.
 
जगभरातील सध्या ऊर्जा वापरापैकी पाच टक्के ऊर्जा इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात वापरली जाते. 2030 पर्यंत हेच प्रमाण 40 ते 50 टक्के इतके होणार आहे. त्यामुळे हे नवे तंत्रज्ञान ऊर्जा वापराच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल, असे मत लॉरेन्स वर्कले राष्ट्रीय प्रयोगशाळेतील सहायक संचालक राममूर्ती रमेश यांनी व्यक्त केले.
सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

LIVE: बीएमसीच्या नामांकित १० नगरसेवकांची नावे जाहीर झाली

नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी तज्ज्ञ समिती स्थापन केली जाईल- मुख्यमंत्री फडणवीस

नितीन गडकरी यांनी दिल्लीतील वाहनांवर लावण्यात येणाऱ्या हरित करावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

होळीच्या दिवशी १,२४४ विशेष गाड्या चालवल्या जातील, रेल्वे मंत्रालयाची घोषणा

छत्रपती संभाजीनगर : पैठण तहसीलमधील कालव्यात झालेल्या कार अपघातात तीन जणांचे मृतदेह सापडले

पुढील लेख
Show comments