Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकदा चार्ज केल्यावर तीन महिने चालणार मोबाइल

Webdunia
मोबाइल चार्ज करणे हे आता ब्रश आणि आंघोळ करण्यासारखे नित्याचे काम होऊन बसले आहे. पण भविष्यात हे काम रोज्याचा रोज करण्याची गरज उरणार नाही. कारण, यापुढे एकदा चार्ज केलेला मोबाइल तब्बल तीन महिने चार्ज करण्‍याची गरज लागणार नाही.
चकित झालात ना? पण हे खरे आहे. सध्याच्या शंभरपट कमी ऊर्जेचा वापर करणार्‍या मोबाइल प्रोसेसरचा शोध लावण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. मिशिगन आणि कॉर्नेल विद्यापीठातील वैज्ञानिकांनी हा शोध लावला आहे. मॅग्नेटोइलेक्ट्रि मल्टीफेरिक असे या उपकरणाचे नाव आहे. हे उपकरण चुंबकीय ध्रुवीय फिल्म तयार करणार्‍या अणूंचा थर पातळ करते. याच सिद्धांताचा वापर करून बायनरी कोड 1 आणि 0 कडे पाठविण्यासाठी करण्यात येतो, ज्यावर आपल्या संगणकाचे काम चालते.
 
मोबाइलमधील सध्याचे प्रोसेसर सेमीकंडक्टर प्रणालीचा वापर करून बनवले जातात. या प्रोसेसरना सतत वीजपुरवठ्याची गरज असते. याउलट, मॅग्नेटोइलेक्ट्रिक मल्टीफेरिक्स यंत्रणेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या प्रोसेसरला विजेच्या कमीत कमी दाबाची आवश्यकता असते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, हा प्रोसेसर विजेचा केवळ एक छोट्यात छोटा भाग वापरून डेटा मिळवू शकतो किंवा पाठवू शकतो.
 
जगभरातील सध्या ऊर्जा वापरापैकी पाच टक्के ऊर्जा इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात वापरली जाते. 2030 पर्यंत हेच प्रमाण 40 ते 50 टक्के इतके होणार आहे. त्यामुळे हे नवे तंत्रज्ञान ऊर्जा वापराच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल, असे मत लॉरेन्स वर्कले राष्ट्रीय प्रयोगशाळेतील सहायक संचालक राममूर्ती रमेश यांनी व्यक्त केले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments