Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे विद्यापीठात धुडगूस घालणाऱ्या अभाविप विद्यार्थ्यांवर काय कारवाई करणार?

Webdunia
सोमवार, 24 एप्रिल 2023 (21:41 IST)
पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये अश्लील गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले होते. त्यानंतर या गोष्टीचा निषेध करत या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. परंतु, आता या प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत अभाविपच्या आंदोलक विद्यार्थ्यांनी धुडगूस घातला. तसेच या आंदोलक विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठात सुरू असलेली कुलगुरुंची बैठक देखील उधळवून लावली. यावेळी या विद्यार्थ्यांनी तोडफोड करत जोरदार घोषणाबाजी केली. पण यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
आमदार रोहित पवार यांनी याबाबत एक ट्वीट केले आहे. “#रॅपसाँग प्रकरणी चौकशी सुरू असताना मोठी शैक्षणिक परंपरा असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या, छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घुसून धुडगूस घालत केलेल्या तोडफोडी च्या कृत्याचा तीव्र निषेध! एरवी आपल्या रास्त शैक्षणिक मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करणारं सरकार, आज धुडगूस घालणाऱ्यांवर काय कारवाई करणार? #SPPU” असे ट्वीट केले आहे. त्यामुळे या आंदोलक विद्यार्थ्यांवर काही कारवाई करण्यात येणार आहे की नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

पुढील लेख