Festival Posters

वसुंधरा प्रकल्पाला नागरिकांचा विरोध, टेकडी वाचविण्यासाठी मनसे देखील रस्त्यावर

Webdunia
सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (08:35 IST)
पुणे शहरातील तळजाई टेकडीवर सकाळच्या वेळेत शेकडो नागरिक व्यायाम करण्यास जात असतात. मात्र त्या टेकडीवर जैववैविधता वसुंधरा प्रकल्प केला जाणार आहे. या प्रकल्पास नागरिकांनी विरोध दर्शविला असून आता टेकडी वाचविण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील रस्त्यावर उतरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर २४ ऑक्टोबर रोजी राज ठाकरे टेकडीला भेट देणार आहेत.
 
आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेता अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांचे पुणे शहरात दौरे वाढले आहेत. त्यामध्ये मागील तीन महिन्यामध्ये राज ठाकरे यांनी पुण्याचा साधारण आठ वेळा दौरा केला आहे. त्या दरम्यान नव्या आणि जुन्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून पक्ष बांधणी करण्याचा प्रयत्न करताना ते दिसत आहेत. यामुळे मनसैनिकांमध्ये चांगलेच नवचैतन्य निर्माण झाले आहे. तर दोनच दिवसांपूर्वी राज ठाकरे हे पुण्यात आले होते. त्यावेळी नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांच्याशी संवाद देखील साधला. त्यानंतर आता तळजाई टेकडीवर १०७ एकरात नव्याने होऊ घातलेल्या नियोजित जैववैविधता वसुंधरा प्रकल्पाला टेकडीवर दररोज येणार्‍या हजारो नागरिकांनी अगोदरच विरोध दर्शवला असताना. यामध्ये मनसेने उडी घेतली असून त्या प्रकल्पांला विरोध दर्शवला आहे.
 
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे २४ ऑक्टोबर रोजी तळजाई टेकडीला भेट देणार आहेत. तिथे भूमिका जाहीर करणार आहेत. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: गडचिरोलीमध्ये NCP नेत्या गीता हिंगे यांचे अपघातात निधन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गीता हिंगे यांचे रस्ते अपघातात निधन; गडचिरोलीत शोककळा

इंडिगो संकटावर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला, म्हणाले-सरकार चौकशी करत आहे

इंडिगोचे संकट सहाव्या दिवशीही सुरूच; विमान कंपनीने ६१० कोटी रुपये परत केले

'मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रास्ते योजना' ला मंत्रिमंडळाने मान्यता दिली

पुढील लेख
Show comments