Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उकाड्यापासून नागरिकांची लवकरच सुटका होणार

Webdunia
रविवार, 30 मे 2021 (11:27 IST)
येत्या 4 ते 5 दिवसात अरबी समुद्रातून येणारे वाष्प आणि राज्यावरून गेलेल्या कमी दाबपट्टीमुळे राज्यात पाऊस येण्याची शक्यता वर्तली जात आहे.हे वाष्प पश्चिमेकडून पूर्वीकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे जमा झाले आहे.त्यामुळे येत्या 4 दिवसात कोकण,मध्य महाराष्ट,मराठवाडा आणि विदर्भात पाऊस येण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.या पावसाने लवकरच उकाड्यापासून नागरिकांची सुटका होऊ शकते.  
 
राज्यात येत्या 2 जून पर्यंत मान्सून येण्याची दाट शक्यता आहे.शनिवारी मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस आला. काल पुण्यात देखील जोरदार पाऊसाने आपली हजेरी लावली हा पाऊस रात्री पर्यंत सुरूच होता. शिवाजीनगर मध्ये 24 मिमी तर लोहगाव मध्ये 36 मिमी पाऊसाची नोंद करण्यात आली.विदर्भ आणि कोकणात देखील पाऊस सुरु होता. 
 
सध्या राज्यावर कमी दाबाचे दोन पट्टे निर्माण झालेत. एक पूर्व उत्तर प्रदेशापासून विदर्भापर्यंत, तर दुसरा पट्टा हा पूर्व मध्य प्रदेशापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत आहे. हा दुसरा कमी दाबाचा पट्टा विदर्भ आणि तेलंगणामार्गे गेला आहे या मुळे अरबी समुद्रातून राज्याच्या दिशेनं बाष्पही येत आहे .यामुळे राज्यात सध्या जोरदार वाऱ्यांसह पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.
 
हवामान विभागानुसार राज्यात 2 जून पर्यंत पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. मोसमी वारे केरळात दाखल होऊ शकते.हवामान विभागाने 1 जून ला केरळात मान्सून दाखल होण्याचे सांगितले होते.
 
महाराष्ट्रात कोकण,विदर्भ,मराठवाडा,या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच आज महाराष्ट्रातील काही भाग आणि जिल्ह्यात पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भात  पाऊस होण्याची शक्यता आहे.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments