भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचा पाया रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे पद्मभूषण डॉ. चिटणीस यांचे वयाच्या 100व्या वर्षी पुण्यात निधन झाले.
ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. एकनाथ वसंत चिटणीस (वय 100 वर्षे) यांचे बुधवारी सकाळी पुण्यात निधन झाले. भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या (इस्रो) निर्मितीत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. 25 जुलै 2025 रोजी ते 100 वर्षांचे झाले असते. कोल्हापुरात जन्मलेल्या चिटणीस यांनी त्यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. त्यांनी रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रात पदव्या मिळवल्या. त्यानंतर त्यांनी रेडिओ कम्युनिकेशनमध्ये डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केला.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांच्या सल्ल्यानुसार, त्यांनी अवकाश आणि क्ष-किरण संशोधन करण्यासाठी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील शिक्षण सोडले आणि ते भारतात परतले. त्यांनी 1960 आणि 1970 च्या दशकात क्ष-किरण आणि अवकाश संशोधनावर संशोधन केले
1961पासून त्यांनी विक्रम साराभाईंसोबत भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमात काम केले. त्यांनी अंतराळ अनुप्रयोग केंद्राचे संचालक म्हणूनही काम केले. त्यांनी उपग्रह प्रक्षेपणासाठी थुंबा स्थळ शोधून काढले. 1962 मध्ये, ते भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समितीचे सदस्य सचिव झाले.
डॉ. चिटणीस यांनी भारताच्या अवकाश क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली, त्यांनी इन्सॅट उपग्रह मालिकेची रचना केली. शैक्षणिक आणि इतर क्षेत्रात अवकाश तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी व्यापक काम केले.विज्ञानातील त्यांच्या योगदानाबद्दल, डॉ. चिटणीस यांना केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
Edited By - Priya Dixit