Festival Posters

महाराष्ट्रात थंडी आणखी वाढणार

Webdunia
बुधवार, 4 जानेवारी 2023 (18:21 IST)
पुणे : राज्यात थंडी वाढली असतानाच किमान तापमानाचा पारा आणखी घसरणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे आता थंडीचा प्रभाव जोर धरणार आहे. दरम्यान मंगळवारी औरंगाबाद येथे सर्वात कमी 9.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.
 
उत्तरेकडील राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेशच्या भागात थंडीची लाट पसरली आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशच्या काही भागात बर्फवृष्टी होत आहे. तसेच या भागात मोठय़ा प्रमाणात धुके पसरले आहे. पुढील चार ते पाच दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा आधीच घसरला आहे. नवीन वर्षाची सुरुवात थंडीनेच झाली आहे. पुढील तीन दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. मात्र, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांत वाढ होणार असल्याने पुढील तीन ते चार दिवसांनंतर मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
 
राज्यातील प्रमुख शहरांत मंगळवारी नोंदविण्यात आलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे अंश सेल्सिअसमध्ये
 
कुलाबा 18.8, सांताक्रूझ 15.8, रत्नागिरी 17.8, डहाणू 15.4,पुणे 10.9, लोहगाव 14.3, जळगाव 10, कोल्हापूर 18, महाबळेश्वर 14.2, नाशिक 10.2, सांगली 16.9,सातारा 14.5,सोलापूर 18.8,परभणी 14.6,नांदेड 16.8, अकोला 14.4, अमरावती 14.9, बुलढाणा 13.2, ब्रह्मपुरी 14.5, चंदपूर 16.3, गोंदिया 11.6, नागपूर 13.6, वाशिम 14.8, वर्धा 13.8, यवतमाळ 15.5, पणजी 20.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

खलिस्तानी दहशतवादी सुखजिंदर सिंग याने भाजप कार्यालयाबाहेर बॉम्बस्फोट घडवून आणला

LIVE: लाडकी बहीण योजना: eKYC ची अंतिम मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवली

महाराष्ट्रात प्रवास महाग झाला, द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवर टोल दरात वाढ

मोदींच्या आश्वासनांवर विश्वास ठेवू नका', संजय राऊत यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

DC vs LSG : दिल्लीने नाणेफेक जिंकून लखनौला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले; दोन्ही संघांचे प्लेइंग ११

पुढील लेख
Show comments