Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

Webdunia
शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (15:55 IST)
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकारने 4 ऑक्टोबर पासून राज्यातील शाळा सुरु  करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु पालकांची आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिकता दिसत नाही. दिवाळीनंतर पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार यांनी पुण्यामध्ये कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

अजित पवार पुढे म्हणाले, लहान मुलांच्या लसीबाबत राज्याने निर्णय घेणं उचित नाही. जोपर्यंत केंद्राच्या पातळीवर निर्णय होत नाही तोपर्यंत आपण काही करु शकत नाही. केंद्र सरकारने लहान मुलांच्या लसीकरणाबाबत लवकरात लवकर कळवावे, असं अजित पवार यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, दुसरा डोस घेतो तो व्यक्ती कोरोनाचे नियम  पाळत नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
मराठवाड्यातील काही तालुके पूर्ण बाधित झाले आहेत.

अजित पवार यांनी सांगितले की, मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ  जाहीर करण्याची मागणी होत आहे.परंतु त्या ठिकाणी काही तालुके पूर्ण बाधित झाले आहेत तर काही ठिकाणी पूर्ण तालुके बाधित झालेले नाहीत.राज्य सरकारने  जिल्हाधिकारी , विभागीय आयुक्त) यांना सूचना दिल्या आहेत.विमा कंपन्यांना सूचना दिल्या आहेत. मराठवड्यात खूप नुकसान झाले आहे.याबाबत आपण माहिती घेत असून मुख्यमंत्री निर्णय घेतील.पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही सकारात्मक असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments