Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात आजपासून काय सुरू, काय राहणार बंद, जाणून घ्या नवीन नियामवली

Webdunia
सोमवार, 14 जून 2021 (12:31 IST)
पुणेकरांना आजपासून जरा दिलासा मिळणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे येथे आजपासून निर्बंध हटवण्यात आले आहे. पुण्यात आजपासून दुकानं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तर हॉटेल्स, बार आणि रेस्टरंट रात्री 10 वाजेपर्यंत खुली राहणार आहे.
 
पुण्यात कोरोनाचा संसर्ग दर 5 टक्कांपेक्षा कमी आल्याने आणि ऑक्सिजन बेडसची संख्या पुरेशी असल्याने सूट देण्यात येत आहे.
नवीन नियमावली
सर्व प्रकारची दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत खुली राहतील. 
हॉटेल्स बार, रेस्टारंट रात्री 10 पर्यंत सुरू राहतील 
पार्सल सुविधा रात्री 11 पर्यंत सुरू असेल.
मॉल्स, थिएटर्स, नाट्यगृह पन्नास टक्के क्षमतेनं खुली राहणार. 
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी निर्बंध. 50 लोकांच्या उपस्थितीत 7 वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजित करायला परवानगी.
लेव्हल 5 असलेल्या ठिकाणी जायण्यासाठी ई-पास आवश्यक असणार. 
शासकीय कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरू. 
खाजगी कार्यालयं मात्र 50 टक्के क्षमतेने सुरू.
वाचनालयं, क्लासेस देखील सुरू. 
उद्याने आणि स्पोर्ट्स देखील दोन वेळा खुली ठेवण्यास परवानगी.
उद्याने सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत खुली राहणार आहे.  
स्पोर्ट्स, क्रीडांगणे देखील सकाळी 5 ते 9 संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत खुली राहणार.
अभ्यासिका, वाचनालये 50 टक्के क्षमतेने संध्याकाळी 7 पर्यंत सुरू राहणार.
मात्र, शहरात संचारबंदी रात्री 10 पासून सुरू होईल
 
अत्यावश्यक सुविधा वगळता इतर दुकाने शनिवारी ,रविवारी  मात्र बंद राहणार आहे. इतर दुकाने आणि हॉटेल्सच्या या विकेंड लॉकडाऊन बाबत पुढील शुक्रवारी 18 जून रोजी आढावा घेतला जाणार आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख