Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मला न विचारताच पाणीपुरीचं पार्सल का आणलं? या वरून पत्नीची आत्महत्या

Webdunia
मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (17:39 IST)
संसारात पती-पत्नीचे कशावरून खटके उडतील याचा नेम नाही. मग अशाच छोट्या मोठ्या कुरबूरीतून कधी कधी धक्कादायक घटना घडतात. अशीच एक घटना पुण्यातील आंबेगाव पठार येथे घडली आहे. प्रतीक्षा गहिनाथ सरवदे (वय 23 रा. आंबेगाव पठार) असे आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. तर गहिनाथ सरवदे (वय 33) असं अटक केलेल्या पतीचे नाव आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गहिनाथ आणि प्रतीक्षा यांचा विवाह फेब्रुवारी 2019 मध्ये झाला होता. गहिनीनाथ हा मुळचा सोलापूर जिल्ह्यातील आहे. त्यांना एक मुलगा आहे. दरम्यान, गहिनीनाथ हा उच्चशिक्षीत असून , तो एका मोठ्या कंपनीत नोकरी करतो. पत्नी गावी राहत होती. तर गहिनीनाथ हा नोकरीनिमित्त पुण्यात राहत होता. त्यावरून त्यांच्यात वाद होत असत. असाच किरकोळ वाद मागील आठवड्यात दोघांमध्ये झाला. गहिनाथ सरवदे हे कामावरून येताना पाणीपुरीचे पार्सल घेऊन आले. 'मला न विचारता पाणीपुरी का आणली' यावरून प्रतीक्षा यांनी गहिनाथ यांच्यासोबत वाद घातला.
 
त्यानंतर पुढील दोन दिवस गहिनाथ कामावर जाताना डब्बा घेऊन जात नव्हते. या दोघांमध्ये त्या दोन दिवसात देखील किरकोळ वाद सुरूच होते. यातून प्रतीक्षा यांनी शनिवारी विषारी द्रव्य प्राशन केलं. विष पिल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्यांना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, प्रतीक्षा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पती गहिनाथ सरवदे यांना अटक केली असून, तपास सुरू असल्याचे भारती विद्यापीठ पोलिसांकडून सांगण्यात आले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments