rashifal-2026

चंद्रकांत खैरेंना शिवसेनेत किंमत नाही; निलेश राणेंची टीका

Webdunia
सोमवार, 30 मे 2022 (09:05 IST)
राज्यसभा निवडणुकीमुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबद्दल सुरु असलेल्या वेगगेगळ्या चर्चांना आता पुर्णविराम मिळाला असून, सर्वच पक्षांनी आपले उमेदवार घोषित केले आहेत. त्यानंतर आता निलेश राणे  यांनी शिवसेनेना नेते चंद्रकांत खैरेंवर हल्लाबोल केला आहे. चंद्रकांत खैरेंनी  नुकताच भाजपवर निशाणा साधताना भाजपने वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला पैसे दिल्याचा आरोप केला होता. त्यावरुन आता निलेश राणेंनी खैरेंना उत्तर दिलं आहे.

चंद्रकांत खैरे यांची खासदारकी गेली त्यामुळे ते सरबरीत झाले आहेत. त्यात आता संजय पवार यांना खासदारकी मिळाल्याने भर पडली आहे. खैरे यांना शिवसेनेत किमंत राहिलेली नाही अशी टीका निलेश राणे यांनी खैरे यांच्यावर केली आहे. भाजपने mim आणि बहुजन वंचित आघाडीला 1 हजार कोटी दिले असे खैरे यांनी म्हटले होते. त्याला निलेश राणे यांनी उत्तर दिले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसकडून इमरान प्रतापगडी यांना उमेदवारी घोषित करण्यात आली असून ते उद्या अर्ज भरणार असल्याचे समजते आहे. परंतु, या निणर्यावर राज्यातील कॉंग्रेस जनांमध्ये नाराजी असल्याचे समोर आले आहे. तर भाजपनेही  अखेरीस नावांची गुपिते उघडली आहेत. महाराष्ट्रातून भाजपाकडून पियूष गोयल आणि अनिल बोंडे  यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजप तिसरा उमेदवार देण्याचीही शक्यता आहे. यामुळे विधानसभेची लढत रंगणार असे दिसत आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे 1.06 कोटी रुपयांची फसवणूक

LIVE: पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

इंडिगो संकटावर भारतीय रेल्वेची मोठी घोषणा, अडकलेल्या प्रवाशांसाठी 84 विशेष गाड्या चालवणार

नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रभावित मार्गांसाठी कमाल भाडे मर्यादा निश्चित केली

पुढील लेख
Show comments