Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यसभेसाठी महाराष्ट्रात कोटा कमी, आता असे असेल गणित

Webdunia
शुक्रवार, 10 जून 2022 (07:57 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे  दोन आमदार सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अनिल देशमुख आणि विद्यमान अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे आता मतदान करू शकणार नाहीत. यामुळे राज्यातील विजय उमेदवाराचा कोटा बदलला आहे.
 
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी आपल्याला राज्यसभेत मतदान करता यावं, या मागणीसाठीचा अर्ज कर्टात दाखल केला होता. त्यांच्या या अर्जावर आज कोर्टात सुनावणी झाली असून ईडीच्या वकिलांनी मलिक आणि देशमुख यांच्या अर्जाला जोरदार विरोध केला. कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतला. त्यानंतर कोर्टाने देशमुख-मलिकांना मतदानासाठी नकार देण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रात विजयी उमेदवारांचा कोटा आता कमी करण्यात आला आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाला परवानगी नाकारल्यामुळे आता राज्याचा कोटा 40.71 इतका झाला आहे. या आधी तो 41.14 इतका होता. म्हणजेच येण्यासाठी 42 मतांची गरज असायची. आता विजयी उमेदवाराचा 41 मतांची गरज आहे.
 
राज्यातील हे आहेत उमेदवार
 
भाजप- पीयूष गोयल, धनंजय महाडिक, डॉ. अनिल बोंडे
 
शिवसेना-संजय राऊत, संजय पवार
 
राष्ट्रवादी - प्रफुल्ल पटेल
 
काँग्रेस- कवी इम्रान प्रतापगढी

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments