Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रक्षाबंधनावर या 5 वस्तू आरोग्यासाठी धोकादायक

Webdunia
रक्षाबंधन म्हणजे उत्साह, आनंद, मस्ती, भेट, नट्टा पट्टा करणे, खाणे, आणि माहेरी आपल्या कुटुंबासह मस्ती करणे. परंतू या सणात आरोग्याची काळजी घेणेही तेवढेच महत्त्वपूर्ण आहे, कारण या सणात आपण वापरत  असलेल्या या 5 वस्तू आरोग्यावर विपरित परिणाम टाकू शकतं- 
1 मिष्टान्न- आपल्याला अधिक मिष्टान्न खाल्ल्याचे दुष्परिणाम माहीतच असतील. परंतू सणासुदी बाजारात मिळणारे मिष्टान्न आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम टाकू शकतात. यात रंगापासून ते स्वाद पर्यंत सर्व बनावटी असतं. ज्या पदार्थांपासून मिष्टान्न तयार करण्यात येतं ते सर्व भेसळयुक्त असतं. म्हणूनच सणासुदी घरी तयार केलेलं गोडधोड खाणे उत्तम ठरेल.

2 खवा- घरी गोड करायचं म्हटले की खवा बाजारातून आणला तरी हे धोकादायक ठरू शकतं. कारण या दिवसात बनावटी खवा विकला जातो. हे तयार करण्यासाठी कास्टिक सोडा वापरण्यात येतो. जे आपल्या पचन तंत्र आणि आरोग्याला प्रभावित करतं.

3 भेसळयुक्त तूप- बाजारातून तूप आणून पदार्थ तयार करण्याचा विचार असेल तर तुपाची शुद्धता तपासून घ्या. कारण शुद्ध तूप विकण्याचा दावा करणारेही अनेक उत्पादक तूप तयार करण्यासाठी जनावरांची चरबी वापरतात. म्हणून सतर्क राहणे आवश्यक आहे.

4  मेटलची राखी- खरं तर राखी  म्हणजे रेशमाची दोरी असते, परंतू हल्ली फॅशन ट्रेंडप्रमाणे मेटॅलीक राखी बाजारात उपलब्ध असते. परंतू राखीमध्ये वापरण्यात येणारी धातू अधिक वेळ पर्यंत आपल्या त्वचेच्या संपर्कात राहिल्यामुळे इन्फेक्शन होण्याची भीती असते. यापासून वाचण्यासाठी साधी दोरी किंवा मोत्यांची राखी उत्तम आहे.

5 नमकीन- घरात करण्याचा कंटाळा आणि जिभेला बाहेरच्या पदार्थांची चव म्हणून आपण नमकीन बाजारातून आणणार असाल तर काळजी घ्या. या नमकीनमुळे उलट्या- जुलाब सारखे रोग होऊ शकतात. सणासुदी हे क्रिस्पी बनविण्यासाठी यात काही डिटर्जेंट आणि इतर हानिकारक पदार्थ मिसळले जातात. हे आरोग्यासाठी धोकादायक आहे.

संबंधित माहिती

11 Maruti Temples समर्थांनी स्थापन केलेले 11 मारुती

Hanuman Jayanti शुभ योग घडत असल्यामुळे या 3 राशींना मिळणार आर्थिक लाभ !

श्री हनूमत् पञ्च चामरम्

हनुमान जयंती प्रसाद इमरती रेसिपी Imarti Recipe

मंगळवारी हनुमान मंत्राचा जाप केल्याने सर्व कष्ट होतील दूर

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

पुढील लेख
Show comments