Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेने या प्रकारे त्याग केला आपल्या देहाचा

Webdunia
सोमवार, 3 ऑगस्ट 2020 (15:50 IST)
रामायणात राम राज्य स्थापित झाल्यानंतरची कथा फारच कमी लोकांना माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे की राम कथेचे समापन कसे झाले होते आणि यांनी आपल्या शरीराचा त्याग कसा केला. जाणून घ्या पूर्ण रोचक कथा ...
 
सीतेच्या अग्नी परीक्षेनंतर जेव्हा प्रजेने सीतेबद्दल ही अफवा फैलावणे सुरू केली की रावणाकडे राहिल्यानंतर सीता अपवित्र झाली आहे. तरीही रामाने तिला महालात ठेवले आहे. रामापर्यंत जेव्हा ही बातमी पोहोचली तर त्यांना फार दुख झाले आणि त्यांनी सीतेला जंगलामध्ये सोडण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मणाने जेव्हा सीतेला जंगलामध्ये सोडले तेव्हा ती गर्भवती होती. तेथे ती ऋषी वाल्मीकीच्या आश्रमात राहत असून तिने दोन मुलांना लव व कुश यांना जन्म दिला.
 
रामाने जेव्हा राजसूय यज्ञाचे आयोजन केले तेव्हा लव कुशने रामायणाचे गायन केले. तेव्हा श्रीरामाला जाणीव झाली की सीता पवित्र आहे आणि त्यांनी ऋषींचा सल्ला घेऊन सीताच्या परीक्षणाचे निर्णय घेतले. सीतेने ते स्वीकार केले.
 
सीतेने या वेळेस देह सोडण्याचा निर्णय घेऊन पृथ्वीशी प्रार्थना केली. हे माते मी कधीही रामाशिवाय कोणाचा स्पर्श केला नसावा. आपले सतीत्व भंग केले नसतील तर तू मला तुझ्यात सामावून घे. तेव्हा धरती फाटते आणि सीता त्यात सामावून जाते.
 
जेव्हा अवतारांची वेळ पूर्ण झाली तेव्हा रामाशी भेटायला काळ आला. काळ अर्थात वेळेचा देवता. काळने रामाला म्हटले की त्यांच्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे आणि ते फक्त आमच्या दोघांमध्येच राहील म्हणून जे कोणी आमच्या गोष्टी ऐकतील तुम्ही त्यांचे वध करून द्या.
 
रामाने त्यांन शब्द पाळण्याचे वचन दिले. रामाने लक्ष्मणाला दारावर पहारा देण्यासाठी उभे केले आणि तेवढ्यात तेथे ऋषी दुर्वासा आले. त्यांनी लक्ष्मणाला रामाची भेट घ्याची असल्याचे सांगितले तेव्हा लक्ष्मण दुर्वासाच्या श्रापाच्या भितीने रामाच्या खोलीत गेले आणि दुर्वासा ऋषीच्या येण्याचे वृत्त दिले. त्यानंतर रामाने आपण दिलेल्या वचनाखातर लक्ष्मणाचा परित्याग केला. 
 
रामाने परित्याग केल्यावर लक्ष्मणाने दुखी होऊन सरयू नदीच्या काठावर आपले प्राणवायू थांबवले आणि सशरीर स्वर्गात गेले. या प्रसंगामुळे राम फारच दुखी झाले त्यांनी लव कुशाचे राज्याभिषेक केले आणि काही काळानंतर सरयू नदीत आपले देह त्यागले.

संबंधित माहिती

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments