Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भरधाव ट्रकने अकोल्यात सहा जणांना चिरडले

Webdunia
बुधवार, 13 ऑगस्ट 2014 (11:08 IST)
अकोल्यात रस्ता ओलांडणार्‍या पाच महिलांसह एक  चिमुकल्याला भरधाव ट्रकने चिरडले. त्यात सर्व महिला आणि  चिमुरड्याचा मृत्यु  झाला. मंगळवारी सकाळी ही घटना घडली.  पाचही महिला शेत मजूर होत्या. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी  आंदोलन केल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतूक बंद  करण्यात आली आहे. संतप्त ग्रामस्थांनी ट्रक पेटवून दिला आणि ट्रक  चालकाला मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोलापासून 25 किलोमीटर अंतरावर  राष्ट्रीय महामार्गावर कोळंबी गावात पाच महिला मजूर सकाळी साडे  नऊच्या शेतीवर काम कऱण्यासाठी निघाल्या होत्या. महामार्ग  ओलांडत असताना भरधाव वेगात असलेल्या ट्रकने त्यांना चिरडले.  या घटनेनंतर ट्रकचालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र  ग्रामस्थांनी पाठलाग करुन त्याला थांबवले. संतप्त ग्रामस्थांनी ट्रकला  पेटवून दिले तसेच ट्रकचालकाला मारहाण करुन पोलिसांच्या ताब्यात  दिले. याघटनेमुळे कोळंबी गावात तणावाचे वातावरण होते.  पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सध्या बंद केली असून  परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
सर्व पहा

नक्की वाचा

पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले

विधानसभा निवडणुकीपूर्वी तुतारी निवडणूक चिन्ह रद्द करण्याची शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

आंदोलकांनी केनियाच्या संसदेला आग लावली,भारताने आपल्या नागरिकांसाठी एक ॲडव्हायजरी जारी केली

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी, मोदी-राहुल गांधींनी सोबत जाऊन केलं अभिनंदन

अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक

सर्व पहा

नवीन

इराणमध्ये नवीन राष्ट्राध्यक्षांच्या निवडीनंतर भारताबरोबरच्या संबंधांवर काय परिणाम होणार?

मुंबईतल्या कॉलेजमधील हिजाब बंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार

पुणे पोर्श कार अपघात आरोपीला जामीन मिळाल्यामुळे मृतक मुलीच्या आईला अश्रू अनावर

शिवराज यांच्या मार्गावर शिंदे सरकार, राज्यामध्ये होऊ शकते लाडली बहना सारख्या योजनेची सुरवात

रस्ते खराब असतील तर टोल टॅक्स घेणे चुकीचे, लोक तर भडकतीलच- नितिन गडकरी

Show comments