Dharma Sangrah

दहावीच्या परीक्षेला सुरूवात

Webdunia
शुक्रवार, 1 मार्च 2024 (08:58 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा शुक्रवारपासून (दि. १) सुरू होत आहे. परीक्षेसाठी २३ हजार २७२ माध्यमिक शाळांमधील १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तणावमुक्त वातावरणात ही परीक्षा द्यावी, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.
 
राज्य मंडळाच्या वतीने माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत घेण्यात येत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा दहावीची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत ३२ हजार १८९ ने वाढ झाली आहे. गेल्यावर्षी १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यंदा खासगी, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. राज्य मंडळाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिकराव बांगर आदी मान्यवर उपस्थित होते. मार्च २०२४ च्या परीक्षेसाठी पेपरच्या नियोजित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत. तसेच दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि श्रेणी परीक्षांचे गुण ऑनलाइन पद्धतीने भरून घेण्यात येत आहेत.
 
नोंदणी केलेले विद्यार्थी
विद्यार्थी : ८,५९,४७८
विद्यार्थिनी : ७,४९,९११
तृतीयपंथी : ५६
एकूण : १६,०९,४४५

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments