Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दशक्रियेसाठी गेलेल्या कुटुंबाची बोट उलटून 11 जण बुडाले

Webdunia
मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (14:16 IST)
वर्धा- वर्धा जिल्ह्यात घडलेल्या एका दुर्घटनेत वर्धा नदीत बोट उलटली आहे. या दुर्घटनेत 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेनंतर अद्याप ३ मृतदेह मिळाले आहेत. 
 
बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत वरूड तालुक्यातील झुंज गावाजवळ ही घटना घडली आहे. बोट नेमकी कशी बुडाली याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.
 
प्राथमिक माहितीनुसार, एकाच कुटुंबातील ११ जण गाडेगाव येथील मटरे कुटुंबीयांकडे दशक्रियेच्या विधीसाठी आले होते. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास वरुडकडे फिरायला गेले असताना कुटुंब महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून नावेने जात होते. मात्र, अचानक नाव उलटली आणि अकराही जण बुडाले. वर्धा जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्या ओसंडून वाहत आहेत. नदीच्या एका किनाऱ्यावरुन दुसऱ्या किनाऱ्यावर जात असताना बोटीला अपघात झाला आहे. या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसल्याने ही दुर्घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
 
या बोटीतून जवळपास 20 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. बोट नदीच्या मधोमध आली असताना अचानक बोट बुडाली. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत काही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अद्याप आठ जणांचा शोध सुरू आहे.
 
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थानी गर्दी केली असून शोध मोहिम आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments