Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हतनूरचे १४ दरवाजे उघडले; तापी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Webdunia
शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (22:44 IST)
उत्तर मध्य महाराष्ट्रात 21 ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने नंदुरबार येथील  हतनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. तापी नदीपात्रात 40 हजार 894 क्युसेक विसर्ग सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
 
पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी 1 वाजता सारंगखेडा प्रकल्पाचा 1 दरवाजा पूर्ण क्षमतेने उघडून 17 हजार 20 क्युसेक्स व प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचा 1 दरवाजा पूर्ण उघडून 13 हजार 222 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आलेला आहे. पुढील 72 तासात सदर प्रकल्पाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी दोन्ही प्रकल्पातून विसर्ग वाढविण्यात येईल. तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments