Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अकरावीसाठी आता फक्त 15 गुण ग्रेस

Webdunia
पुणे- राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अकरावी उत्तीर्णतेच्या निकषांमध्ये बदल केला आहे. एखादा विद्यार्थी तीन विषयांत अनुत्तीर्ण असेल, तर त्याला यापूर्वी 30 गुण ग्रेस दिले जात होते. त्याला आता केवळ 15 गुण ग्रेस मिळतील. यामुळे अकरावीत नापासाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
 
अकरावीचा अभ्यासक्रम पुनर्रचित केल्याने हा बदल करण्यात आला आहे. बारावीप्रमाणे अकरावीसाठी हा नियम लागू राहील. तो केवळ तीन विषयांसाठी मर्यादित असेल. एकाच विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण असेल, तर त्याला कमाल दहाच गुण ग्रेस म्हणून दिले जातील. अकरावी आणि बारावी परीक्षेतील उत्तीर्ण होण्याच्या निकषातील तफावत यामुळे दूर होणार आहे, असे मंडळाने स्पष्ट केले.
 
अकरावीत तीन विषयांत व दोन विषयांत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी 30 गुण विभागून दिले जात होते. म्हणजे त्याला तीन विषयांत प्रत्येकी दहा गुण मिळत होते. आता तेवढे गुण मिळणार नाहीत.
 
विद्यार्थी तीन व दोन विषयांत अनुत्तीर्ण असेल, तर त्याला बारावीप्रमाणे 15 गुण विभागून दिले जातील. निकषात बदल करण्याचा प्रस्ताव मंडळाने राज्य शासनाकडे पाठविला होता.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments