Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात पुन्हा भाकरी फिरणार!अजित गटाचे 19 आमदार लवकरच पक्ष बदलणार -रोहित पवारांचा दावा

Webdunia
मंगळवार, 18 जून 2024 (17:37 IST)
लोकसभा निवडणुकीत अजितपवाराच्या पक्षाचा पराभव झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात अजित पवार यांच्या गटाला महाराष्ट्रात केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. शरद पवार यांच्या गट राष्ट्रवादीने लोकसभेच्या 8 जागा जिंकल्या आहेत. अजित पवार यांच्या गटातील एकाही नेत्याला केंद्रात मंत्री करण्यात आलेले नाही.

येत्या पावसाळी अधिवेशनांनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील 19 आमदार पक्ष बदलणार असून आमच्या पक्षात येणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांनी केला. 
ते म्हणाले, अजित पवारांच्या गटात असे अनेक आमदार आहे ज्यांनी जुलै मध्ये पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आणि इतर बड्या नेत्या बद्दल काहीच वाईट बोलले नाही. 

राष्ट्रवादीचे 18 ते 19 आमदार आहेत, ते आमच्या आणि पवार साहेबांच्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवार यांच्या नातवाने केला आहे. अजित गटाचे हे सर्व आमदार पावसाळी अधिवेशनानंतर त्यांच्यासोबत जाणार आहेत.
 अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार पुढे म्हणाले की, पक्षात कोणाचा समावेश करायचा याचा निर्णय शरद पवार आणि राष्ट्रवादीचे इतर नेते घेतील.

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून सुरू होऊन 12 जुलै रोजी संपणार आहे.ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीचे हे शेवटचे अधिवेशन असेल. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या NCP (SP) ने महाराष्ट्रात 8 जागा जिंकल्या, तर अजित पवार गटाच्या NCP ला फक्त एक जागा मिळाली.
 
Edited by - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

कोरोना महामारीदरम्यान मृत्यू झालेल्या 5 कोरोना योद्ध्यांना दिल्ली सरकार प्रत्येकी 1 कोटी रुपये देणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले

दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये प्रवाशांच्या जेवणात आढळले झुरळ

मुंबई सिनेट निवडणुकामध्ये शिवसेनाने यश मिळवला, ही तर विजयाची सुरुवात -आदित्य ठाकरे

अरविंद केजरीवाल लवकरच मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार

पुढील लेख
Show comments