Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मतिमंद निवासी शाळेत अन्नातून विषबाधा, २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Webdunia
बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (22:07 IST)
नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील  इगतपुरी तालुक्यातील मतिमंद विद्यार्थ्यांच्या निवासी शाळेत दोन मतिमंद विद्यार्थ्यांचा अन्नातून विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विषबाधेतून दोन विद्यार्थीची प्रकृती गंभीर असून या दोघांनाही नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालय, इंदिरा भारती कर्णबधीर निवासी महाविद्यालय तसेच रखमाबाई अपंग युवक स्वयंसहायता केंद्र या विद्यालयांमध्ये ही घटना घडली आहे.
 
या विद्यालयात एकुण १२० विद्यार्थी असून मंगळवारी रात्री त्यांनी खिचडीचे खाल्ली. त्यानंतर बुधवारी पहाटे यातील ८ विद्यार्थ्यांना उलटल्यांचा त्रास झाला. त्यानंतर त्यांना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर दोन विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे. अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज असून या विषबाधेतून हर्षल गणेश भोईर (वय २३ रा. भिवंडी) आणि मोहम्मद जुबेर शेख (वय १० रा. नाशिक) या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर देवेंद्र बुरुंगे (१५) व प्रथमेश बुवा (१७) या दोन विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांना मोठ्या प्रमाणावर उलट्या आणि पोटदुखीचा त्रास जाणवत आहे. या निवासी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी तातडीने सुरु करण्यात आली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. खाल्लेल्या अन्नाचे नमुने जमा करण्यात आले असून तपासणीसाठी पुढे पाठविण्यात आले आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments