Marathi Biodata Maker

लक्ष्मीपूजनादिवशीच 3 शेतकऱ्यांची आत्महत्या

Webdunia
शुक्रवार, 5 नोव्हेंबर 2021 (17:37 IST)
गेल्या काही दिवसांपासून चंद्रपुरात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरुच आहे. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चंद्रपुरात तीन शेतकर्यांनी आपल्या आयुष्याचा दुर्दैवी शेवट केला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील तारसा बुद्रुक येथे 25 वर्षीय तरुण शेतकरी वैभव अरुण फरकडे याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर चेक पिपरी येथील 34 वर्षीय शेतकरी महेश भास्कर मारकवार यांनी विषारी औषध प्राशन करत ऐन ‍लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच जगाचा निरोप घेतला. तरुण शेतकर्यांानी ऐन दिवाळी सणाच्या दिवशी आयुष्याचा शेवट केल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिसर्यान एका घटनेत चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंड पिपरी तालुक्यातील किरमीरी येथील बंडू रामटेक यांनी आपलं जीवन संपवलं आहे. मृत रामटेके यांच्या सोयाबीनच्या ढिगाला आग  लागल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तीन शेतकर्यांआनी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

गोंदियातील गौसिया मशिदीने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली

LIVE: उरण मार्गावर अतिरिक्त उपनगरीय रेल्वे सेवांना मंजुरी देण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

केंद्र सरकारने इंडिगो प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले

मालेगावात 13 वर्षीय मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक

उरण मार्गावर अतिरिक्त उपनगरीय रेल्वे सेवांना मंजुरी देण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

पुढील लेख
Show comments