Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोर्टात पोहोचण्यास ३० मिनिटांचा उशीर, "दोघा पोलिसांना ठोठावण्यात आली लक्षात राहणारी शिक्षा"

Webdunia
बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 (21:49 IST)
परभणी : न्यायालयात अर्धा तास उशीरा पोहोचलेल्या दोन पोलिसांना न्यायालयाकडून आयुष्यभर लक्षात राहणारी शिक्षा सुनावण्यात आली. ही शिक्षा परभणी इथल्या न्यायालयानं ठोठावली आहे. मानवत पोलीस ठाण्यातील हवालदार आणि पोलीस शिपायाला कोर्टात ३० मिनिटे उशिरा पोहोचले. त्यामुळे दोघांनाही गवत काढायची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील मानवत पोलिस स्टेशनमधील हवालदार आणि हेड कॉन्स्टेबल सुट्टीकालीन कोर्टात ३० मिनिटे उशिरा पोहोचले. त्यामुळे दोघांनाही परिसरातील गवत छाटण्याचे काम सोपवण्यात आले होते. हे दोघे पोलिस रात्रीच्या गस्तीवर होते. त्यांनी रविवार २२ ऑक्टोबर रोजी पहाटे मानवत येथे दोघा जणांना संशयास्पद अवस्थेत फिरताना ताब्यात घेतले. अटकेत असलेल्या दोघांना सकाळी ११ वाजता सुट्टीकालीन न्यायालयासमोर हजर करण्यात येणार होते. मात्र, संशयितांसह पोलिस सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास न्यायालयात पोहोचले.
 
त्यामुळे त्यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांचा रोष ओढवून घेतला. त्यांनी दोघांनाही परिसरातील गवत कापण्याचे आदेश दिले. या असामान्य शिक्षेमुळे अस्वस्थ झालेल्या हवालदारांनी ही बाब त्यांच्या वरिष्ठांना कळवली. त्यानंतर २२ ऑक्‍टोबर रोजी पोलिस स्टेशन डायरीत त्याची अधिकृतपणे नोंद करण्यात आली आणि त्याचा तपशीलवार अहवाल विभागातील उच्चपदस्थांना पाठवण्यात आला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

रशियाने आणखी एका अमेरिकन व्यक्तीला ताब्यात घेतले ड्रग्जची तस्करी करण्याचा आरोप

LIVE: महायुती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढणार

मुंबईत सायबर गुन्हेगारांनी 39 वर्षीय व्यक्तीच्या बँक खात्यातून 1.55 लाख रुपये काढले

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आवाहन केले

मुंबईत कौटुंबिक वादातून वडिलांनी केली 4 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या

पुढील लेख
Show comments