Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हतनूर धरणाचे ४१ दरवाजे पूर्णपणे उघडले; तापी नदीकाठी सतर्कतेचे आवाहन

Webdunia
शनिवार, 24 जुलै 2021 (08:32 IST)
हतनूरमधून 1 लाख 30 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने सकाळी 6 वाजता हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत.तापी नदीपात्रात 1 लाख 30 हजार 665 क्युसेक विसर्ग सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
 
पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सारंगखेडा प्रकल्पातील 4 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून 51 हजार 925 क्युसेक्स व प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पातील 5 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून 75 हजार 56 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आलेला आहे. हतनूर क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाण्याचा वाढता येवा लक्षात घेता दोन्ही प्रकल्पातून विसर्ग वाढविता येईल. तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments