Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात निर्माण होणार ४८८ आदर्श शाळा, असे आहेत निकष

Webdunia
बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (08:13 IST)
राज्यातील सर्व मुलांना समान गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळण्याबरोबर विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित करण्यासाठी राज्य सरकारने आदर्श शाळा विकसित करण्याची महत्वाकांक्षी योजना आखली असून योजनेअंतर्गत लहान शाळांच्या बांधकामासाठी ५३ कोटींचा निधी वितरित करण्याचा निर्णय शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने घेतला आहे.
 
मुलांना समान गुणवत्तापूर्वक सर्वोच्च शिक्षण देण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यात ४८८ आदर्श शाळा निर्माण करण्याची योजना राज्य सरकारने आखला आहे. शासकीय शाळांचा चेहरामोहरा बदलण्याच्या हेतूने या आदर्श शाळा विकसित करण्याची योजना आहे.
 
आदर्श शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी सुसज्ज भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे, वर्ग खोल्या संगणकीकरण शाळा दुरुस्ती, शैक्षणिक साहित्य अशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या निधीचा उपयोग करण्यात येणार आहे. या शाळांचा विविध स्तरावर विकास केला जाईल.
 
आदर्श शाळा योजने अंतर्गत विशिष्ट निकषांच्या आधारे शाळांची निवड करण्यात येते. यामध्य वाढता लोकसहभाग, भविष्यातील वाढती पटसंख्या आणि किमान १०० तसेच १५० पटसंख्या, शाळेच्या प्रांगणात अंगणवाडी, विद्यार्थी संख्येनुसार वर्ग खोल्या, मुला-मुलींसाठी स्वतंत्र आणि पुरेशी स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, हँडवाँश स्टेशन, मध्यान्ह भोजनासाठी स्वयंपाकगृह, शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य, ग्रंथालय, वाचनालय, संगणक कक्ष, व्हर्च्युअल क्लास रुम, शाळेला संरक्षण भिंत, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने अग्नीशमन यंत्रणा, विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था, इयत्ती पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे तयारी असे आदर्श शाळा निवडीचे निकष आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

चेन्नईला त्यांच्याच मैदानावर कोलकात्याकडून कठीण आव्हानाला सामोरे जावे लागेल

पाकिस्तानने तहव्वुर राणापासून स्वतःला दूर केले, तो कॅनेडियन नागरिक असल्याचे सांगितले

तहव्वुर राणाला बिर्याणी खायला देण्याची गरज नाही, संजय निरूपमयांचा काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंवर घणाघात वार

तहव्वुर राणा मुंबईसारख्या इतर शहरांमध्ये हल्ल्यांचा कट रचत असल्याचा एनआयएचा दावा

LIVE: मुंबईत भारतातील पहिले आयआयसीटी असेल मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

पुढील लेख
Show comments