Marathi Biodata Maker

लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात असलेल्या कारचा अपघात, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 28 मार्च 2022 (16:48 IST)
अमरावती- लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबाचा अपघात झाल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात नांदगावपेठ-देवलगाव रिंगरोडवर घडला. माहितीनुसार ट्रक आणि कार यांची धडक एवढी भीषण होती की, कारचा चुरा झाला तर ट्रकची पुढील दोन्ही चाके निघून गेली. अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. 
 
अंजनगाव सुर्जी गावातील रहिवासी हे कुटुंब एका लग्न समारंभासाठी वाळगावमार्गे नांदगावपेठ येथे जात असताना पोटे कॉलेजजवळ कार आली असताना चालकाने दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचवेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकशी कारची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की ट्रक विजेच्या खांबाला धडकून रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला जाऊन पडला. तर कारचा चुरा झाला. 
 
अपघातात चार जणांचा मृत्यू जागीच झाला होता, एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी ट्रकचालक अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेला. आरोपींचा शोध सुरू आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

भाविकांनी भरलेल्या ट्रॉलीला ट्रकची धडक, सहा जणांचा मृत्यू

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारने डॉक्टर असल्याचे भासवून कौन्सलिंगच्या नावावर विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली

LIVE: NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई: पुण्यातील एका ज्येष्ठ वनस्पतीशास्त्र शिक्षिकेला दिल्लीत अटक

नीट यूजी परीक्षा वाद छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुढील लेख
Show comments