Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात असलेल्या कारचा अपघात, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 28 मार्च 2022 (16:48 IST)
अमरावती- लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबाचा अपघात झाल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात नांदगावपेठ-देवलगाव रिंगरोडवर घडला. माहितीनुसार ट्रक आणि कार यांची धडक एवढी भीषण होती की, कारचा चुरा झाला तर ट्रकची पुढील दोन्ही चाके निघून गेली. अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. 
 
अंजनगाव सुर्जी गावातील रहिवासी हे कुटुंब एका लग्न समारंभासाठी वाळगावमार्गे नांदगावपेठ येथे जात असताना पोटे कॉलेजजवळ कार आली असताना चालकाने दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचवेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकशी कारची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की ट्रक विजेच्या खांबाला धडकून रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला जाऊन पडला. तर कारचा चुरा झाला. 
 
अपघातात चार जणांचा मृत्यू जागीच झाला होता, एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी ट्रकचालक अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेला. आरोपींचा शोध सुरू आहे.

संबंधित माहिती

KKR vs SRH सामन्यात पाऊस पडला तर IPL फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळेल? तपशीलवार जाणून घ्या

T20 World Cup 2024:भारत पहिल्यांदाच या संघांशी भिडणार, जाणून घ्या सामना कधी होणार

मुंबईत पक्ष्यांच्या कळपावर विमानाची धडक लागून 40 फ्लेमिंगोचा मृत्यू

परळी मध्ये उष्माघाताने भाजीविक्रेताचा मृत्यू

SRH vs KKR : कोलकाता आणि हैदराबाद अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या इराद्याने समोर येणार

सोलापुरात घरगुती वादाला कंटाळून महिलेने तलावात उडी घेतली, लोकांनी वाचवले तिचे प्राण

धोनी लंडनला जाऊन उपचार घेणार, नंतर निवृत्तीचा विचार करणार!

छपरामध्ये मतदानानंतर तरुणाची हत्या, 2 जणांना अटक

सोशल मीडिया बनला जीवघेणा शत्रू , ट्रोलिंगने घेतला आईचा जीव

भगवान जगन्नाथांशी जोडलेल्या टीकेवर संबित पात्राने मागितली माफी, म्हणाले-प्रायश्चित्तासाठी ठेवेल 3 दिवस उपास

पुढील लेख
Show comments