Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भावली धरणात बुडून 5 जणांचा दुर्देवी मृत्यू

Webdunia
बुधवार, 22 मे 2024 (09:43 IST)
नाशिकच्या इगतपुरीच्या भावली धरणात पाच जणांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये 3 मुली व 2 मुलांचा समावेश आहे. 

हे पाच जण  धरणावर फिरायला आले होते. सदर घटना 21 मे रोजी संध्याकाळी घडली आहे. 
नाशिकरोड भागातील गोरेवाडी परिसरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तारू आणि तरुणी हे रिक्षाने इगतपुरीच्या भावली धरणावर फिरायला आले असता ते पाण्यात उतरले मात्र त्यांना पाण्याच्या अंदाज आला नाही आणि ते बुडाले. 

घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी स्थानिकांच्या मदतीने पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले 

हे सर्व जण गोसावी वाडी नाशिक रोड परिसरातील राहणारे असून अनस खान(15), हनीफ शेख(24), ईकरा खान(14), नासिया खान(15), मिजबाह खान (16) अशी मयतांची नावे आहेत. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघे पाण्यात बुडू लागल्याने दोघे त्यांना वाचवण्यासाठी गेले असता तेही बुडाले. पोलिसांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शव विच्छेदनासाठी पाठविले आहे.पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit    
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुलगाममध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, 4 दहशतवादी ठार

36 वर्षांच्या महिलेला अजगराने गिळलं

मी नाही साडी नेसत जा!', नैतिकता, संस्कृतीचे निकष महिलांच्या कपड्यापाशीच येऊन का थांबतात?

Hathras Stampede:हातरस दुर्घटनेतील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सुरतमध्ये भीषण अपघात, सहा मजली इमारत कोसळली,15 जण जखमी

सर्व पहा

नवीन

Ind vs zim : अभिषेक शर्माच्या नावावर लज्जास्पद विक्रम,पदार्पणातच फ्लॉप

IND vs ZIM:पहिल्या T20 सामन्यात झिम्बाब्वे कडून भारताचा 13 धावांनी पराभव

मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे केरळमध्ये तीन जणांचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात

नरेंद्र मोदी यांनी केले किएर स्टार्मर यांचे अभिनंदन, दोन्ही नेत्यांची फोनवर चर्चा

पुढील लेख
Show comments