rashifal-2026

यवतमाळमध्ये ४८ तासांत ६ शेतक-यांची आत्महत्या

Webdunia
बुधवार, 27 डिसेंबर 2023 (08:28 IST)
दुष्काळ आणि सततच्या नापिकीने त्रस्त झालेल्या 6 शेतक-यांनी यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 48 तासांत आत्महत्या केल्या आहेत. सरकार सत्तेत आल्यापासून आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याच्या घोषणा करीत आहेत मात्र शेतकरी आत्महत्येच्या वाढत्या घटना पाहता सरकारने केलेल्या घोषणा हवेतच विरल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
 
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यम प्रतिनिधींशी विविध विषयांवर संवाद साधला. शेतकरी आत्महत्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, अवकाळी पावसाच्या नुकसानभरपाईची मदत अद्याप शेतक-यांना मिळाली नाही. सरकारने जाहिरातींद्वारे प्रसिध्द केलेले आकडे हे कागदावरच राहिले आहेत. विश्वगुरू म्हणून मिरवणारा भाजप जनतेचे प्रश्न सोडविण्यात सपशेल अपयशी ठरला आहे म्हणूनच भाजप सध्या ते राम मंदिराच्या मुद्यावरून भावनिक फुंकर घालून राजकारण करीत आहेत, अशी टीका दानवे यांनी केली. इंडिया आघाडी भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई यावर निवडणुका लढणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

नागपूरमध्ये एका उघड्या नाल्यात एका 3 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला

टिपू सुलतान इंग्रजांशी लढताना शहीद झाले, ओवैसींचा भाजपवर हल्लाबोल

नागपूर गुन्हे शाखेने पॉश परिसरातील 4 क्रिकेट बुकींना अटक केली

उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments