rashifal-2026

यवतमाळमध्ये ४८ तासांत ६ शेतक-यांची आत्महत्या

Webdunia
बुधवार, 27 डिसेंबर 2023 (08:28 IST)
दुष्काळ आणि सततच्या नापिकीने त्रस्त झालेल्या 6 शेतक-यांनी यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 48 तासांत आत्महत्या केल्या आहेत. सरकार सत्तेत आल्यापासून आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याच्या घोषणा करीत आहेत मात्र शेतकरी आत्महत्येच्या वाढत्या घटना पाहता सरकारने केलेल्या घोषणा हवेतच विरल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
 
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यम प्रतिनिधींशी विविध विषयांवर संवाद साधला. शेतकरी आत्महत्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, अवकाळी पावसाच्या नुकसानभरपाईची मदत अद्याप शेतक-यांना मिळाली नाही. सरकारने जाहिरातींद्वारे प्रसिध्द केलेले आकडे हे कागदावरच राहिले आहेत. विश्वगुरू म्हणून मिरवणारा भाजप जनतेचे प्रश्न सोडविण्यात सपशेल अपयशी ठरला आहे म्हणूनच भाजप सध्या ते राम मंदिराच्या मुद्यावरून भावनिक फुंकर घालून राजकारण करीत आहेत, अशी टीका दानवे यांनी केली. इंडिया आघाडी भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई यावर निवडणुका लढणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: मनसेच्या २० व्या स्थापना दिनी राज ठाकरे यांनी तरुणांसाठी "महा-सदस्यत्व मोहीम" जाहीर केली

पुणे ट्रॅफिक सुधारणा: एकात्मिक उड्डाणपुल आणि इतर प्रकल्पांची चर्चा

युद्धामुळे तेल बाजारात घबराट; कच्च्या तेलाचे दर ११५ डॉलर्सच्या पुढे गेले, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतील?

गुरमीत राम रहीमची निर्दोष सुटका

महाराष्ट्रातील आजचे हवामान (९ मार्च २०२६): उष्णता वाढली, कोणत्याही ठिकाणी पाऊस नाही

पुढील लेख
Show comments