Festival Posters

धुळे येथे केमिकल कंपनीत भीषण स्फोट 7 जणांचा मृत्यू तर 35पेक्षा अधिक जखमी

Webdunia
धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट  झाला असून भीषण स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला. तर 35 पेक्षा अधिक  जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण  स्फोटानंतर फार मोठ्या प्रमाणात आग लागली असून, आगीने रौद्र रूप धारण केले आहे. या स्फोटात अधिक लोकांचा मृत्य होण्याची शक्यता आहे. या अपघातामुळे धुळे सह संपूर्ण राज्य हादरले आहे.
 
सविस्तर वृत्त असे की, शिरपूर शहराजवळ असलेल्या वाघाडी केमिकल फॅक्टरी मध्ये सकाळी दहाच्या सुमारास हा भयानक स्फोट झाला व  त्यानंतर भीषण आग लागली. या आगीने रौद्ररुप धारण केले आहे. या ठिकाणी बचाव पथक , रुग्णवाहिका आणि  अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
 
हा स्फोट झाल्यानंतर स्थानिकांनी अग्निशमन, पोलिसांना तातडीने माहिती दिली. हा भयानक स्फोट झाला त्यानंतर मोठा  आवाज झाला होता, पोलिसांनी घटनास्थळाकडे जाण्यापासून नागरिकांना थांबवले असून संपूर्ण परिसर सुरक्षित केला आहे . त्या ठिकाणी आता  केवळ बचाव पथकांनाच जाऊ दिलं जात आहे.
 
हा भीषण स्फोट कसा काय झाला याचे कारण समोर आले नाही. स्थानिक नागरिकांनी सांगितल्या नुसार या  स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की तो अनेक किलोमीटर लांबपर्यंत ऐकायला गेला तर  या स्फोटाने परिसर अक्षरश: हादरला आहे. तर आगीमुळे आकाशात धुराचे लोट पसरले आहेत. या कंपनीत नेमके किती कामगार होते याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस पथक बचाव पथक सर्व मिळून यातील अडकलेल्या लोकांना वाचवत असून जखमींना त्यांनी रुग्णालयात दाखल केले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

Republic Day 2026 Wishes in Marathi प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

भारतीय इतिहासातील सर्वात मोठी दरोडा! १००० कोटी रुपये घेऊन जाणारा ट्रक गायब झाला

Hapus Mango पुण्यातील फळ बाजारात हापूस आंब्याची एंट्री, पहिली पेटी १५,००० रुपयांना विकली गेली

पद्म पुरस्कार: ५ पैकी ३ पद्मविभूषण केरळवासीयांना... शशी थरूर यांनी आनंद व्यक्त केला

संजय राऊत यांनी भाजप-शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला, "जर मला सत्ता मिळाली तर मी त्याचे १५ तुकडे करेन"

पुढील लेख
Show comments