Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोदान एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला लागली आग, मोठा अनर्थ टळला

Webdunia
शनिवार, 23 मार्च 2024 (09:54 IST)
शहरालगत असलेल्या नाशिकरोड रेल्वे स्थानकातुन भुसावळ कडे जाणाऱ्या गोदान एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला आग लागल्याची घटना घडली. रेल्वे गार्ड च्या वेळीच लक्षात आल्याने गाडी थांबवून बोगीची आग विझवण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला. मात्र बोगी मध्ये नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
 
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुबंई लोकमान्य टिळक टर्मिनस वरून -गोरखपूरला जाणारी गोदान एक्सप्रेस शुक्रवारी दुपारी नेहमी प्रमाणे नाशिकरोड रेल्वे स्थानकात आली. पुढे स्थानक सोडल्यानंतर गोरेवाडी नजीक, मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रा जवळून गोदान एक्सप्रेस जात असतांना गाडीच्या मागील पार्सल बोगी मधून धुराचे लोट बाहेर येताना दिसले. काही सेकंदात वारा अधिक लागल्याने बोगी मधून आगीचे लोट येऊ लागले.शेजारील बोगी मधील प्रवासीच्या सदर बाब लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केला.
 
त्यानंतर गाडीच्या गार्डला समाजल्या नंतर त्यांनी तात्काळ गाडी थांबवली. गाडी थांबताच प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. दरम्यान तात्काळ अग्निशमन दलाला कळवण्यात आले. मात्र रेल्वे गाडी अडचणीच्या ठिकाणी थांबल्याने त्याना घटनास्थळी पोहचण्यात कसरत करावी लागली. तो पर्यंत रेल्वे कर्मचारी यांनी फोमच्या सहाय्याने आग विझावण्याचा प्रयत्न केला.
 
अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. मात्र हाय टेन्शन असलेला विद्युत पुरवठा पूर्ववत असल्याने बोगी वर पाणी मारणे शक्य नव्हते. अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ रेल्वेपासून आगीने बाधित झालेली बोगी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. बोगी वेगळी झाल्यानंतर गोदान एक्सप्रेस पुढील प्रवासाला रवाना झाली.
 
या बाधित बोगीच्या शेजारी सर्वसाधारण बोगी होती, मात्र गाडी स्थानकातून सुटल्याने हळू धावत होती, म्हणून जीवितहानी झाली नाही, जर गाडी अजून काही किलोमीटर गेली असती तर मोठी दुर्घटना झाली असती.या घटनेची उच्च सत्तरावर चौकशी होईल असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले आहे.
Edited By -Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसोबत बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

गुजरातमध्ये 4 ISIS दहशतवाद्यांना अटक, ATS तपासात गुंतली

छत्तीसगडच्या कवर्धामध्ये पिकअप दरीत कोसळली, 18 मजुरांचा मृत्यू

12वीचा निकाल उद्या लागणार

IPL 2024: पहिल्या क्वालिफायरमध्ये हैदराबादचा सामना कोलकाताशी

स्मृति इराणी यांनी गौरीगंजमध्ये केले मतदान, विकसित भारत संकल्प आणि महिला कल्याणासाठी टाकले मत

समुद्रात संपले नावेचे इंधन, भारतीय तटरक्षक दलाने वाचवले 26 लोकांचे प्राण

नाइट्रोजन पान खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलीच्या पोटात झाले छिद्र

पुढील लेख
Show comments