Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात सुमारे 36 लाख नवीन मतदार

Webdunia
बुधवार, 9 जानेवारी 2019 (08:58 IST)
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात सुमारे 36 लाख नवीन मतदारांची भर पडणार आहे. त्यामध्ये तरुण मतदारांची संख्या अधिक असून तृतीयपंथीयसुध्दा आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जागृत झाला आहे. राज्यभरात ऑक्टोंबर 2018 अखेर 2025 तृतीयपंथीयांची मतदार नोंदणी झाली आहे. राज्यात 1 सप्टेंबर 2018 ते 11 जानेवारी 2019 या कालावधीत मतदार नोंदणी अभियान सुरु आहे. आतापर्यंत 36 लाख नवीन अर्ज आले असून त्यामध्ये मागील नोंदणीच्या तुलनेत यंदा महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे समजते.
 
निवडणूक कर्मचार्‍यांनी घरोघरी जाऊन ज्यांची नोंदणी नाही, पण मतदानासाठी पात्र असलेल्या व्यक्तींचा शोध घेतला. 1 जानेवारी 2019 रोजी अठरा वर्षे पूर्ण झालेले, घरातील व्यक्तीचे नाव दुसर्‍या मतदार यादीत असलेले, मयत व स्थलांतरीत झालेले, नावात दुरुस्ती व दिव्यांग मतदारांची यादी तयार केली आहे. तसेच ज्यांची नावे दोनपेक्षा अधिक मतदार यादीत आढळली, अशांची नावे वगळली आहेत. 11 जानेवारी 2019 रोजी अंतिम यादी तयार होण्याची शक्यता आहे. या यादीतील व्यक्ती मतदानासाठी पात्र असतील, असे एका निवडणूक अधिकार्‍याने सांगितले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments