suvichar

ठाण्यात बेकायदेशीर वसतिगृहात गैरवर्तन प्रकरण उघडकीस,29 मुलांची सुटका पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Webdunia
शनिवार, 12 एप्रिल 2025 (15:37 IST)
ठाणे जिल्ह्यात एका संस्थेद्वारे चालवणाऱ्या अनधिकृत वसतिगृहात होणाऱ्या गैरवर्तनच्या तक्रारी नंतर 29 मुलांची सुटका करण्यात आली आहे. अशी माहिती प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. 
ALSO READ: ठाणे : आधी मैत्री नंतर कोट्यवधींची फसवणूक करून पीडितेला विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न
जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, शुक्रवारी पोलिसांनी एका निवासी संस्थेतून 20 मुली आणि 9 मुलांची सुटका केली आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध बाल न्याय कायदा 2015 आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
 
चाइल्ड हेल्पलाइन' ला गुरुवारी तक्रार मिळाली होती की संस्थेत मुलांना मारहाण आणि लैंगिक शोषण केले जात आहे. जिल्हा महिला आणि बालविकास कार्यालयाच्या पथकाने पोलिसांसह शुक्रवारी संस्थेची पाहणी केली आणि मुलांशी बोलल्यानंतर त्यांना आरोप खरे असल्याचे आढळून आले, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मुक्त केलेल्या मुलांना बाल कल्याण समितीसमोर सादर करण्यात आले.
ALSO READ: डेंग्यूच्या रुग्णाचे काढले ६ लाख रुपये बिल, अमृत दिले का? आमदारांनी डॉक्टरांना विचारला जाब
ठाणे जिल्हा दंडाधिकारी अशोक शिनगारे म्हणाले की, मुलांची सुरक्षा आणि कल्याण हे नेहमीच प्रशासनाचे प्राधान्य राहिले आहे. त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी संतोष भोसले यांनी अशा अनधिकृत संस्थांविरुद्ध पुढे येण्याचे आणि मुलांवर होणारे कोणतेही अत्याचार किंवा शोषण नोंदवण्याचे आवाहन लोकांना केले.
 
Edited By - Priya Dixit  
ALSO READ: एफडीए विभागाने नागपूर जिल्ह्यात कारखान्यावर छापा टाकून ३० लाख रुपयांची सुपारी केली जप्त
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

Sarojini Naidu Death Anniversary सरोजिनी नायडू पुण्यतिथी

युद्धामुळे शेअर बाजार कोसळला

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून भाविकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

टीम इंडियाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले

अजित पवारांचा मृत्यू १००% कट, विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला

पुढील लेख
Show comments