Marathi Biodata Maker

Accident : चंद्रपूर येथे भीषण रस्ता अपघात, कार आणि बसच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 5 जून 2023 (09:12 IST)
महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये रविवारी एक भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला . एक कार नागपूरहून नागभीडच्या दिशेने जात असताना खासगी बसला धडकली, असे सांगण्यात येत आहे. ही धडक इतकी जोरदार होती की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. त्याचवेळी या भीषण अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात नेत असताना तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड-नागपूर रस्त्यावरील कानपा गावाजवळ हा अपघात झाला. अपघातातील गंभीर जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.
 
 एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, नागभीडपासून 17 किमी अंतरावर असलेल्या कानपा गावात रविवारी संध्याकाळी 4 वाजता ही घटना घडली. एका कारमध्ये सहा जण असून ते नागपूरहून नागभीडच्या दिशेने जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या खासगी बसला धडकली
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धडक इतकी भीषण होती की कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. वाहनाच्या काचा फोडून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्याचवेळी या अपघातात गंभीर जखमी झालेल्या नऊ वर्षीय मुलीचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. तर दुसऱ्या जखमीचा नागभीडच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या पोलिसांनी बस चालकाला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
 
Edited by - Priya Dixit    
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचा लाच घेताना व्हिडिओ प्रसिद्ध केला

सरकारने इंडिगोविरुद्ध कडक कारवाई केली; एअरलाइनने 10 टक्के उड्डाणे कमी केली

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या मतदार यादीच्या तारखा बदलल्या, नवीन वेळापत्रक जाहीर

UIDAI चा मोठा निर्णय, आधार फोटोकॉपी बंद होणार; नवीन नियम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments