Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वन नेशन वन इलेक्शनवरून आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Webdunia
गुरूवार, 19 सप्टेंबर 2024 (10:46 IST)
वन नेशन-वन इलेक्शनवरून आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि भाजपला धारेवर धरले आहे ते म्हणाले की, जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्राच्या निवडणुका एकाच वेळी होत नाही. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक टप्प्यांत निवडणुका होत आहे, त्याही सुरक्षेच्या कारणास्तव. महाराष्ट्रात अजून अनेक नगरपालिकांच्या निवडणुका होत नाही आणि आता हे लोक वन नेशन वन इलेक्शनच्या गप्पा मारत आहे.भाजपला निवडणुकीची भीती वाटते.
 
मिळालेल्या माहितीनुसार ते पुढे म्हणाले की, आमचा पक्ष म्हणतो की मंत्रिमंडळात शिफारसी ठेवण्यापूर्वी या लोकांनी कोणाशी चर्चा केली? निवडणूक आयोग हा एक विनोद आहे. यानंतर त्याने बांगलादेश क्रिकेट संघाच्या दौऱ्यावरही प्रश्न उपस्थित केले.
 
जेव्हा-जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा आपल्या देशात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, असे आदित्य ठाकरे म्हणाले. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहे की नाही हे भाजपने सांगावे. भाजप फक्त निवडणुकीसाठी हिंदूंचा वापर करते का? बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा मुद्दा पुन्हा पुन्हा ऐरणीवर येत असल्याचेही आपण सोशल मीडियावर पाहिले आहे. दोन दिवसांत कसोटी सामना होणार असून बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार झाले आहे की नाही, याचा खुलासा भाजपला करावा लागणार आहे.
 
तसेच महाराष्ट्रात होत असलेल्या गुन्ह्याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, नागपुरात 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला, तरीही मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर सेलिब्रिटींसोबत फोटो काढण्यात व्यस्त आहे.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

LIVE: महायुती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढणार

मुंबईत सायबर गुन्हेगारांनी 39 वर्षीय व्यक्तीच्या बँक खात्यातून 1.55 लाख रुपये काढले

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आवाहन केले

मुंबईत कौटुंबिक वादातून वडिलांनी केली 4 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या

नागपूरच्या कोतवालबुडी येथे फटाक्याच्या कारखान्यात स्फोटात दोघांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments