Festival Posters

काँग्रेसचेही आमदार फुटणार म्हणाले आदित्य ठाकरे

Webdunia
शनिवार, 3 सप्टेंबर 2022 (07:50 IST)
मुंबई : शिवसेनेनंतर आता काँग्रेसचेही नऊ आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याच्या आणि काँग्रेस फुटणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. यावरून राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मुंबईतील चंदनवाडीच्या गणपतीच्या दर्शनाला आदित्य ठाकरे गेले असता माध्यामांनी त्यांना घेरले. त्यावेळी काँग्रेस आमदार फुटण्यावर विचारलं असता “जाऊ दे ना, आपण आत्ता जर-तर, अगर-मगरपेक्षा देवाचं दर्शन घेऊ आणि त्या आशीर्वादाने पुढे जाऊ.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
 
दरम्यान, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला दोन महिने झाले आहेत. या सरकारला किती गुण द्याल? असा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले, उत्सवाच्या दिवशी मी राजकारणावर बोलत नाही. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्यामुळे त्यावर काहीही बोलणार नाही. उत्सवाच्या काळात जो कुणी राजकारण करत असेल तो बालिशपणा आहे. लोकांना हे सगळं दिसत आहे.
 
एवढं राजकारण झालं तर लोकांना राजकारणाचा कंटाळा येईल. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळानंतर आता सणवारांचा आनंद घेत आहेत. त्यामुळे राजकारण बाजूला ठेऊन लोकांना याचा आनंद घेऊ द्यावा. काही पक्षांकडून सगळीकडे राजकारण होत आहे. हे लोकांना दिसत आहे. ते कुणालाही आवडत नाही. आज आपण गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेत आहोत. हे सगळं त्यांच्या आशीर्वादावरच चाललं आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

बीड: मित्रांनी वाढदिवसाला न बोलावल्याने २४ वर्षीय तरुणाची आत्महत्या; "मी एकटा पडलोय," शेवटचं स्टेटस ठेवून संपवलं जीवन

डोसा खाल्ल्यानंतर दोन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू; पालकांची प्रकृती चिंताजनक

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ५१ लाख सुवासिक फुलांची भव्य सजावट, पाहा मनमोहक फोटो

डीजेच्या मोठ्या आवाजामुळे संतप्त झालेल्या मधमाश्यांच्या हल्ल्यात क्रिकेट मैदानावर एकाचा मृत्यू तर अनेक गंभीर जखमी

परभणी-जिंतूर महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; बहीण-भावाचा जागीच मृत्यू, परिसरात हळहळ

पुढील लेख
Show comments