Festival Posters

आता लायक व्यक्ती नेमा : आदित्य ठाकरे

Webdunia
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017 (10:18 IST)

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.   संजय देशमुख यांना कुलगुरुपदावरुन हटवले आहे. आता सरकारने पुन्हा चूक करु नये आणि या पदावर लायक व्यक्ती नेमावी अशी मागणी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. कुलगुरु जबाबदारीतून मुक्त झाले, पण विद्यार्थ्यांचे जे नुकसान झाले, वर्ष वाया गेले आणि मनस्ताप झाला, त्याची भरपाई सरकार कशी करणार असा सवालही त्यांनी विचारला आहे.

ऑनलाइन मूल्यांकनाच्या निर्णयामुळे वादग्रस्त ठरलेले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांची मंगळवारी पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. अक्षम्य निष्काळजीपणा आणि ऑनस्क्रीन मूल्यांकनाची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवून राज्यपालांनी देशमुख यांना कुलगुरुपदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला. मुंबई विद्यापीठाच्या १५० वर्षांच्या इतिहासात कुलगुरुंची हकालपट्टी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

त्यानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

LIVE: महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांना धक्का, मित्रपक्ष सचिन खरात यांनी युती तोडली

पाचवी कसोटी 5 विकेट्सने जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध 4-1 असा अ‍ॅशेस जिंकला

निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे अजित पवारांच्या विधानाने राजकीय वर्तुळात भूकंप

लज्जास्पद! पुरुषी मानसिकतेने पेंटिंग्सही सोडल्या नाहीत, अगदी कलाकृतींविरुद्धही गुन्हे केले

सारा तेंडुलकरने मराठीत सांगितली आजीची आठवण; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

पुढील लेख
Show comments