Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता लायक व्यक्ती नेमा : आदित्य ठाकरे

Webdunia
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017 (10:18 IST)

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.   संजय देशमुख यांना कुलगुरुपदावरुन हटवले आहे. आता सरकारने पुन्हा चूक करु नये आणि या पदावर लायक व्यक्ती नेमावी अशी मागणी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. कुलगुरु जबाबदारीतून मुक्त झाले, पण विद्यार्थ्यांचे जे नुकसान झाले, वर्ष वाया गेले आणि मनस्ताप झाला, त्याची भरपाई सरकार कशी करणार असा सवालही त्यांनी विचारला आहे.

ऑनलाइन मूल्यांकनाच्या निर्णयामुळे वादग्रस्त ठरलेले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांची मंगळवारी पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. अक्षम्य निष्काळजीपणा आणि ऑनस्क्रीन मूल्यांकनाची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवून राज्यपालांनी देशमुख यांना कुलगुरुपदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला. मुंबई विद्यापीठाच्या १५० वर्षांच्या इतिहासात कुलगुरुंची हकालपट्टी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

त्यानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे. 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments