Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'10 मार्चनंतर महाविकास आघाडी सरकारवर सत्ता सोडण्याची वेळ येणार' - चंद्रकांत पाटील

Webdunia
रविवार, 13 फेब्रुवारी 2022 (11:17 IST)
पाच राज्यांच्या निवडणुकींच्या निकालानंतर अशी परिस्थिती निर्माण होईल की महाराष्ट्रातून महाविकास आघाडी सरकारलाही सत्तेवरून जावं लागेल असं भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा वर्तवलं आहे.
 
भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात पोलीस पक्षपातीपणे कारवाई करत असल्याचा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले, "महाविकास आघाडी सरकारची आताची परिस्थिती पाहिली तर कोणाही सांगू शकेल की हे सरकार आता जास्त काळ टिकणार नाही. आतापर्यंत दोन मंत्र्यांचे राजीनामे झाले. इतरांचेही येतील. पोलिसांच्या बदल्यांबाबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून आपल्याला यादी येत होती असं माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी मान्य केलं आहे. तर देशमुख म्हणाले अनिल परब यांच्याकडून त्यांना यादी येत होती."
 
"तसंच परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना पुन्हा नोकरीत घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी दबाव आणल्याचं म्हटलं आहे. अशी स्थिती निर्माण होईल की महाविकास आघाडीला सत्ता सोडावी लागेल," असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments