Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनसे प्रमुख राज ठाकरेंना औरंगाबाद रॅलीपूर्वी AIMIM ने इफ्तारसाठी बोलावलं

Webdunia
शनिवार, 30 एप्रिल 2022 (12:18 IST)
1 मे रोजी औरंगाबाद येथील मेळाव्याची घोषणा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचे निमंत्रण मिळाले आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनने ठाकरेंना इफ्तारसाठी निमंत्रण दिल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे मनसे प्रमुखांच्या रॅलीपूर्वी औरंगाबादमध्ये पोलिसांनी कलम 144 लागू केले होते. मात्र, त्यांना काही अटींसह रॅलीची परवानगी मिळाल्याचे वृत्त आहे.
 
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार AIMIM औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ठाकरे यांना इफ्तार पार्टीसाठी आमंत्रित केले आहे. शहरात शांतता आणि एकोपा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात त्यांनी हा निर्णय घेतला आहे. वृत्तानुसार, पुण्यात रात्रभर मुक्काम केल्यानंतर ठाकरे शनिवारी सकाळी औरंगाबादला रवाना होऊ शकतात. काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुखांनी 3 मेपर्यंत मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम दिला आहे.
 
मनसेच्या एका नेत्याने सांगितले की, 'रॅली काढण्यासाठी पोलिसांनी 15 अटी घातल्या आहेत...' या मेळाव्याबाबत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, "त्यांनी (राज ठाकरे) किती वेळा मत बदलले हा पीएचडीचा विषय आहे."तर  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतात, "या रॅलीबद्दल राज्यातील लोकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे."
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments