Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारने आणखी किती माणसं मारायचं ठरवलं आहे? - अजित पवार

Webdunia
बुधवार, 26 जुलै 2017 (15:35 IST)
घाटकोपर येथील सिद्धिसाई या इमारतीला झालेल्या दुर्दैवी अपघाताबाबत आज राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली. सिद्धीसाई इमारत दुर्घटनेत १७ जणांचा बळी गेला आहे. ज्या ज्या वेळी पावसाळा येतो तेव्हा अशा घटना घडून अनेकांचा दुर्दैवी मृत्यू होतो. घाटकोपर येथील इमारत तळमजल्यावरील नुतनीकरणाच्या कामामुळे झाला आहे.
 
या कामाला पालिकेची परवानगी न घेता इमारतीच्या मूळ आराखड्यात बदल केला गेला. तक्रार देऊनही पालिकेने याकडे लक्ष दिले नाही. शिवसेनेचे पदाधिकारी सुनील शितप यांनी रहिवास्यांच्या तक्रारीला न जुमानता हे नुतनीकरणाचे काम केले होते, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी केला आहे. ही दुर्घटना मानवनिर्मित असून या गंभीर विषयावर सभागृहात याची चर्चा करावी यासाठी मुंडे यांनी सभागृहात २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला.
 
सरकारच्या व प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे दरवर्षी कित्येक हकनाक बळी जातात. सरकारने आणखी किती माणसं मारायचं ठरवलं आहे, असा जळजळीत प्रश्न विधिमंडळ पक्षनेते अजित पवार  यांनी सभागृहात विचारला. यावर काहीतरी उपाय होणार आहेत की नाही असा त्यांनी सरकारला जाब विचारला.
 

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments