rashifal-2026

तीनही मंत्र्यांचा काळे फुगे सोडून आदिवासी कोळी समाजातर्फे निषेध

Webdunia
गुरूवार, 18 जानेवारी 2024 (08:38 IST)
जळगाव : जातीचे दाखले नोंदींवरून सरसकट मिळावेत, जातवैधता प्रमाणपत्र मिळावे, यांसह अन्य मागण्यांची शासन-प्रशासन दखल घेत नसल्याने आदिवासी कोळी समाज बांधवांनी येथे पुन्हा सुरू केलेल्या आंदोलनाच्या 14 व्या दिवशी बुधवारी जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांच्या प्रतिमा तसेच मंत्रिमहोदयांनी आकाशावरून जमिनीवर यावे, जास्त हवेत उडू नये, असा उल्लेख असलेले काळे फुगे आकाशात सोडून निषेध केला.
 
शहरातील शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आदिवासी कोळी आंदोलन समितीतर्फे अन्नत्याग आंदोलन चालू आहे. पुंडलिक सोनवणे, प्रभाकर कोळी हे उपोषणास बसले आहेत. बुधवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास समितीतर्फे प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वात संतप्त समाजबांधवांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि मदत व पुनवर्सनमंत्री अनिल पाटील यांच्या प्रतिमा व त्यांनी आकाशावरून जमिनीवर यावे व जास्त हवेत उडू नये, असा उल्लेख असलेले काळे फुगे आकाशात सोडले. राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात बबलू सपकाळे, विशाल सपकाळे, दीपक तायडे, प्रल्हाद सोनवणे आदी सहभागी होते.
 
प्रा. सोनवणे यांनी, आदिवासी टोकरे कोळी समाजाला जातीचे दाखले व जातवैधता प्रमाणपत्र सुलभरित्या न दिल्यास याची किंमत शासनाला मोजावी लागेल, असा इशारा दिला. जिल्ह्यातील एकही मंत्री आंदोलनस्थळी आलेला नाही. मंत्र्यांनी जनतेकडे यायला हवे आणि अडचणी सोडवल्या पाहिजेत, अशी मागणी करुन प्रा. सोनवणे यांनी, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यावरही टीका केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: गडचिरोलीमध्ये NCP नेत्या गीता हिंगे यांचे अपघातात निधन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गीता हिंगे यांचे रस्ते अपघातात निधन; गडचिरोलीत शोककळा

इंडिगो संकटावर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला, म्हणाले-सरकार चौकशी करत आहे

इंडिगोचे संकट सहाव्या दिवशीही सुरूच; विमान कंपनीने ६१० कोटी रुपये परत केले

'मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रास्ते योजना' ला मंत्रिमंडळाने मान्यता दिली

पुढील लेख
Show comments