Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विवाहित प्रेमीयुगुलाची धारदार चायना चाकूने गळा चिरत, पोटात वार करून आत्महत्या

Webdunia
गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (08:31 IST)
अमरावतीच्या परतवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणार्‍या येणी पांढरी येथील शेतशिवारात बुधवारी  विवाहीत प्रेमीयुगुलाचे  मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांची आत्महत्या आहे कि हत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, परतवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या कांडली ग्रामपंचायत हद्दीतील वनश्री कॉलनी येथील रहिवासी सुधीर रामदास बोबडे ( 48 ) व एक महिला दोघेही सोमवारी दुपार पासून बेपत्ता होते. त्यांची शोधाशोध सुरू होती. त्यांच्या प्रेमसंबध होते, अशी माहिती आहे. दरम्यान येणी पांढरी येथील राकेश अग्रवाल यांच्या शेतशिवारात दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत मिळाले.
 
माहिती मिळताच परतवाडा पोलिस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तेथे दोघांचे मोबाईल, पर्स, चायना चाकू व इतर साहित्य आढळले. प्रथमदर्शनी दोघांनी आत्महत्या  केल्याचे निदर्शनास येते. पण, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. महिलेच्या गळ्यावर व पोटावर तर सुधीर याच्या गळ्यावर चायना चाकूचे वार होते. सुधीर हा कविठा स्टॉप येथे पानटपरीचा व्यवसाय करित होता व त्याला दोन मुले आहेत तर महिलेला एक मुलगा व एक मुलगी आहे. दोघेही विवाहित असून त्यांची हत्या की आत्महत्या या चर्चेला पेव फुटले आहे . पोलिस तपासानंतरच या घटनेच्या पाठीमागचे कारण उलगडेल असे पोलिसांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनने अख्खा भारत व्यापला, जुलैत पाऊस कसा असेल? जाणून घ्या

Weather News : राज्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे मतदारांना आवाहन

डोनाल्ड ट्रंप यांना कॅपिटल हिल दंगलप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा दिलासा, न्यायालयाने काय म्हटलं? वाचा

विधान परिषद सभागृहात शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवे यांचं निलंबन

सर्व पहा

नवीन

Hathras incident: हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर

180 कोटी रुपयांचे कर्ज न भरल्याचे प्रकरण, विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

हाथरसमध्ये सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 100 पेक्षा जास्त

नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना 'बालक बुद्धी' संबोधून प्रत्युत्तर पण 'मणिपुरा'त वाहून गेलं भाषण

भारत न्याय संहिता लागू; यापुढे जुन्या IPC कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांवर काय परिणाम होतील?

पुढील लेख
Show comments