Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेताला पाणी द्यायचं होत म्हणून, तो मोटार चालू करायला गेला..!

Webdunia
शनिवार, 26 मार्च 2022 (08:14 IST)
नाशिक : पिकाला पाणी देण्याकरिता विद्युत मोटर सुरू करण्यासाठी गेलेल्या सोळा वर्षीय मुलास विजेचा जबर शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. येवला तालुक्यातील डोंगरगाव येथे ही घटना घडली.
 
करण बाळू तळे (१६) असे या मुलाचे नाव आहे. येवला तालुक्यातील डोंगरगाव येथे तळे कुटुंबीय राहत आहे. दरम्यान काल (दि.२४) दुपारच्या सुमारास करण पिकाला पाणी देण्यासाठी वीज पंप चालू करत असताना त्याला मीटर पेटी व्दारे विजेचा जबर धक्का बसला. विजेच्या धक्क्यानंतर तो खाली कोसळला. याबाबत आजूबाजूच्या शेतकऱ्यांना माहिती होताच घटनास्थळी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली.
 
यावेळी बेशुद्ध अस्वस्थेत असताना करणे चुलते संजय तळे यांनी तात्काळ त्यास येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉ. सोनवणे यांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान, करणचा असा अपघाती मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments