Marathi Biodata Maker

चला तयारीला लागा! आषाढी वारीच्या तारखांची अखेर घोषणा; पाऊले चालती पंढरीची वाट

Webdunia
सोमवार, 9 मे 2022 (08:16 IST)
वारकरी संप्रदाय ज्या क्षणाची डोळ्यात तेल घालून वाट पाहत असतात त्या आषाढी वारीच्या तारखांची घोषणा झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून आषाढी वारी नेहमीप्रमाणे साजरी होऊ शकलेली नाही. त्यामुळे यंदा मोठ्या उत्साहात आषाढी वारी संपन्न होणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्येही मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.
 
जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी येत्या २० जूनला पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. देहू संस्थानने यासंदर्भात आज घोषणा केली आहे. ही घोषणा होताच वारकऱ्यांनी जल्लोष केला आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यात एकूण ३२९ दिंड्या सहभागी होणार आहेत. ही पालखी दोन ठिकाणी मुक्कामी असणार आहे. त्यात पुणे आणि इंदापूर या दोन ठिकाणांचा समावेश आहे. देहू येथून पालखी निघेल पायी प्रवास करुन ती ९ जुलै रोजी पंढरपूरमध्ये पोहचणार आहे. १० जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपुरात रंगणार आहे.
 
आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी २१ जूनला प्रस्थान करणार आहे. कोरोनाचे निर्बंध यंदा शिथील केल्याने दोन्ही पालख्या अतिशय उत्साहात संपन्न होणार आहेत. दोन्ही पालख्यांच्या प्रस्थानाच्या तारखा जाहीर झाल्याने वारकरी बांधव तयारीला लागले आहेत. गेल्या वर्षी अत्यंत मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत आणि शिवनेरी बसच्या माध्यमातून पालखी निघाल्या होत्या. यंदा मात्र, अनादी काळापासूनच्या परंपरेप्रमाणे वारी संपन्न होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

८८ अयातुल्ला खमेनी अजूनही जिवंत आहेत, ही लढाई दीर्घकाळ चालेल

LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या ११ नगरसेवक आणि कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

परराष्ट्र धोरणावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

राज्यसभा निवडणुकीवर आदित्य ठाकरे यांचे मोठे विधान: 'महाविकास आघाडीत कोणताही गतिरोध नाही म्हणाले

मुंबई आणि पुण्यातील भाविकांना महाकालेश्वर आणि उत्तर भारतातील दर्शनासाठी रेल्वे भारत गौरव ट्रेन चालवणार

पुढील लेख
Show comments