Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

“जेव्हा एका माथेफिरुने शरद पवारांच्या कानशिलात लगावली तेव्हा”, आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

Webdunia
शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (15:53 IST)
जनआशीर्वाद यात्रेत राणे यांच्यासोबत असलेले भाजपा आमदार आशिष शेलार यांनीही आता शिवसेनेवर कठोर टीका केली आहे. सिंधुदुर्गात लावण्यात आलेली जमावबंदी राजकीय असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. तसंच काही वर्षांपूर्वी एका माथेफिरुने शरद पवार यांच्या कानशिलात लगावली होती,त्या प्रसंगाची आठवणही शेलार यांनी यावेळी करुन दिली आहे.शिवसेनेला काही जुन्या प्रसंगांची आठवण करुन देताना आशिष शेलार म्हणाले,आज त्यांच्यासोबत जे सत्तेत बसले आहेत ते माननीय शरद पवार साहेब यांच्या कानशिलात एका माथेफिरुने मारल्याची दुर्दैवी घटना अख्ख्या देशाने पाहिली.

पवारांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अशी प्रतिक्रिया दिली नाही.आणि हा तर मग केवळ वाक्यातला जर तरचा मुद्दा होता कानशिलात लगावण्याचा.त्याच्यावर जी प्रतिक्रिया दिली ते एका संकुचित मनोवृत्तीचं दर्शन एका संयमित पक्षासोबत राहूनसुद्धा शिवसेनेने केलं आहे.कालही आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांना महाराष्ट्रातल्या असहिष्षुतेचे जनक असं संबोधलं होतं. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments